शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

ममदापूर येथे हरणाचा मृत्यू

By admin | Updated: October 1, 2016 00:37 IST

ममदापूर येथे हरणाचा मृत्यू

ममदापूर (ता. येवला) : येथील दत्तात्रय साबळे यांच्या विहिरीत पडल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दत्तात्रय साबळे शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता विहिरीत मृतावस्थेतील हरीण त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जालिंदर साबळे यांच्या मदतीने वनसमिती अध्यक्ष गणेश गायकवाड यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर विहिरीत पडलेल्या हरणाला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्ता ओलांडताना किंवा अन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून जीव वाचविताना हरणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या कमी होण्याच्या दृष्टीने वनविभागाने वेळीच नियोजन करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. हरणांना जीव गमवावा लागू नये यासाठी वनविभागातील वनक्षेत्रांना संरक्षक जाळ्या तयार करून त्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी वनसमितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे हरणांकडून होणारे नुकसान टळले जाईल व त्यांचे प्राण वाचले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)