शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:36 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देटॅकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.जून महिना देखील उन्हाळयासारखाच जाणवतो आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेतो. सध्या उन्हाची तीव्रता हि जास्तच वाढल्यामुळे घरात जीवाची तहान भागविण्यासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी राजापूर व पूर्वकडील भागात दुष्काळामुळे पाणी टंचाई असल्याने टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.राजापूर येथील वाड्या-वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असल्याने येथे दोन टॅकरने पाणी पूरवठा सुरू असून गावासाठी दोन खेपा तर वाड्या-वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहे. परंतू जून महिना सुरू झाला अन पाणी टंचाईने जनता हैराण झाली आहे. येथील जनतेला पिण्यासाठी पाणी व जनावरांचा चारा या संकटाने शेतकरी धास्तावले आहे.विहिरी कोरड्या पडल्या असल्यानेपाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहेत. अलगट वस्ती, हवालदार वस्ती,भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहेत, तर काही वस्त्या वाड्या-मोठ्या असून तसेच काही लहान वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे जेवढे गाव आहे त्यापेक्षा जास्त जनता वाड्यावस्तीवर राहत असल्याने एकदा टॅकर आल्यावर २० ते २२ दिवसांनी पून्हा त्या वस्तीवरील जनतेला पाणी मिळते आहे गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व जनावरांना चारा नाही या दोन्ही समस्याने जनता हवालिदल झाली आहे अजून पाऊस झाला नसल्याने सगळ्याचे डोळे आकाशाकडे लागले आहे कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅकर गेला कि मोठ्या वस्त्यावर १२ हजार लिटरच्या टॅकरच्या ६ ते ७ खेपा लागतात तेव्हा त्या वस्त्यावर दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते सध्या २४ हजार लिटरचा एक टॅकर व १२ हजार लिटरचा एक टॅकरच्या दोन खेपा होतात. मात्र ते पुरत नाही. गावात वीस दिवसापासुन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी वाटप करताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागतेआहे. त्यामुळे गावासाठी व वाड्या-वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व वाड्या वस्त्यावरील रिहवासायांनी केली आहे.(फोटो २२ राजापूर)