शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:36 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देटॅकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.जून महिना देखील उन्हाळयासारखाच जाणवतो आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेतो. सध्या उन्हाची तीव्रता हि जास्तच वाढल्यामुळे घरात जीवाची तहान भागविण्यासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी राजापूर व पूर्वकडील भागात दुष्काळामुळे पाणी टंचाई असल्याने टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.राजापूर येथील वाड्या-वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असल्याने येथे दोन टॅकरने पाणी पूरवठा सुरू असून गावासाठी दोन खेपा तर वाड्या-वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहे. परंतू जून महिना सुरू झाला अन पाणी टंचाईने जनता हैराण झाली आहे. येथील जनतेला पिण्यासाठी पाणी व जनावरांचा चारा या संकटाने शेतकरी धास्तावले आहे.विहिरी कोरड्या पडल्या असल्यानेपाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहेत. अलगट वस्ती, हवालदार वस्ती,भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहेत, तर काही वस्त्या वाड्या-मोठ्या असून तसेच काही लहान वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे जेवढे गाव आहे त्यापेक्षा जास्त जनता वाड्यावस्तीवर राहत असल्याने एकदा टॅकर आल्यावर २० ते २२ दिवसांनी पून्हा त्या वस्तीवरील जनतेला पाणी मिळते आहे गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व जनावरांना चारा नाही या दोन्ही समस्याने जनता हवालिदल झाली आहे अजून पाऊस झाला नसल्याने सगळ्याचे डोळे आकाशाकडे लागले आहे कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅकर गेला कि मोठ्या वस्त्यावर १२ हजार लिटरच्या टॅकरच्या ६ ते ७ खेपा लागतात तेव्हा त्या वस्त्यावर दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते सध्या २४ हजार लिटरचा एक टॅकर व १२ हजार लिटरचा एक टॅकरच्या दोन खेपा होतात. मात्र ते पुरत नाही. गावात वीस दिवसापासुन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी वाटप करताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागतेआहे. त्यामुळे गावासाठी व वाड्या-वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व वाड्या वस्त्यावरील रिहवासायांनी केली आहे.(फोटो २२ राजापूर)