शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजापूर वाड्या-वस्त्यावर तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:36 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देटॅकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.जून महिना देखील उन्हाळयासारखाच जाणवतो आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेतो. सध्या उन्हाची तीव्रता हि जास्तच वाढल्यामुळे घरात जीवाची तहान भागविण्यासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी राजापूर व पूर्वकडील भागात दुष्काळामुळे पाणी टंचाई असल्याने टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे.राजापूर येथील वाड्या-वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असल्याने येथे दोन टॅकरने पाणी पूरवठा सुरू असून गावासाठी दोन खेपा तर वाड्या-वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहे. परंतू जून महिना सुरू झाला अन पाणी टंचाईने जनता हैराण झाली आहे. येथील जनतेला पिण्यासाठी पाणी व जनावरांचा चारा या संकटाने शेतकरी धास्तावले आहे.विहिरी कोरड्या पडल्या असल्यानेपाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहेत. अलगट वस्ती, हवालदार वस्ती,भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहेत, तर काही वस्त्या वाड्या-मोठ्या असून तसेच काही लहान वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे जेवढे गाव आहे त्यापेक्षा जास्त जनता वाड्यावस्तीवर राहत असल्याने एकदा टॅकर आल्यावर २० ते २२ दिवसांनी पून्हा त्या वस्तीवरील जनतेला पाणी मिळते आहे गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व जनावरांना चारा नाही या दोन्ही समस्याने जनता हवालिदल झाली आहे अजून पाऊस झाला नसल्याने सगळ्याचे डोळे आकाशाकडे लागले आहे कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅकर गेला कि मोठ्या वस्त्यावर १२ हजार लिटरच्या टॅकरच्या ६ ते ७ खेपा लागतात तेव्हा त्या वस्त्यावर दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते सध्या २४ हजार लिटरचा एक टॅकर व १२ हजार लिटरचा एक टॅकरच्या दोन खेपा होतात. मात्र ते पुरत नाही. गावात वीस दिवसापासुन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी वाटप करताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागतेआहे. त्यामुळे गावासाठी व वाड्या-वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व वाड्या वस्त्यावरील रिहवासायांनी केली आहे.(फोटो २२ राजापूर)