शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई भीषणता

By admin | Updated: July 8, 2014 00:53 IST

नगर जिल्ह्यात ३२१ टँकरने पाणीपुरवठा

नरेश हाळणोर

नाशिकयंदा जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही कोकण व मुंबई वगळता राज्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. नाशिक विभागात सुमारे साडेपाचशे पाण्याचे टॅँकर सुरू असून, यात नगर जिल्हा आघाडीवर तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील दोनशे गावांची तहान भागविण्यासाठी १८१ पाण्याचे टॅँकर रात्रंदिवस फेऱ्या मारत असून, यात मागणी वाढत असल्याने दिवसागणिक भरही पडते आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणेही प्रशासनाला कठीण जाणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. यावेळी जून महिन्यात राज्यात कोठेही समाधानकारक पाऊस झाला नसून जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मुंबई वगळता इतरत्र पावसाने ओढच दिल्याने पाण्याची समस्या नाशिक विभागात निर्माण झाली आहे. विभागातील पाच जिल्ह्यांपैकी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. उर्वरित धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात नाममात्र टॅँकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सुमारे २५२ गावे आणि ११७८ वाड्यांना ३२१ टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, तर नाशिक जिल्ह्यात ४७ गावे व २४४ वाड्यांना १८१ टॅँकरने पाणीपुरवठा होतो आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाण्याची टंचाईची तीव्रता वाढून टॅँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी मागणीच्या तुलनेत टॅँकर उपलब्ध करून देण्याची समस्या प्रशासनाला आत्ताच भेडसावते आहे.