शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा उत्पादनात घट

By admin | Updated: July 10, 2016 22:28 IST

वणी : दुष्काळी स्थिती; अनुत्पादक बियाण्यांमुळे प्रतिकूल परिणाम

 वणी : दुष्काळी स्थितीमुळे टमाटा उत्पादनात आलेली घट व लागवड केलेल्या क्षेत्रात अनुत्पादक बियाण्यांमुळे टमाटा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याने टमाट्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. गरजपूर्तीसाठी कर्नाटकमधील बेंगळुरू भागातून टमाटा खरेदी करावा लागत असल्याची माहिती टमाटा व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. टमाटा खरेदी-विक्रीच्या माध्यमातून सध्या कर्नाटकमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. महाराष्ट्रात टमाटा उत्पादित होऊन प्रतिदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते हा प्रतिवर्षीचा अनुभव; मात्र वेळेवर पाऊस झाला नाही तसेच लागवड केलेल्या काही क्षेत्रांमध्ये सदोष बियाण्यांमुळे उत्पादनात घट आली. नाशिक जिल्हा टमाटा उत्पादनात अग्रेसर असून, उत्पादनात घट झाल्याने परराज्यातून टमाटा खरेदी करून गरज भागविली जात आहे. सद्यस्थितीत पुणे भागातील नारायणगाव व संगमनेर भागातून सुमारे २५ ट्रक टमाट्याची आवक होत आहे. स्थानिक ठिकाणी टमाटा अपुरा पडतो, सध्या कर्नाटक राज्यातील बेंगळुरू भागातील कोल्हार, चिंतामणी, अनंतपुरम, मदनपल्ली, ओसूर भागात मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादक विक्रीसाठी आणतात. हा टमाटा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र नाही, तर राजस्थान, पंजाब, गुजरात, दिल्ली उत्तर प्रदेश, ओरिसा या भागात किमान प्रतिदिन एक हजार ट्रक म्हणजेच एक कोटी साठ लाख किलो टमाटा खरेदी विक्रीची उलाढाल होत असल्याची माहिती संजय उंबरे यांनी दिली. प्रतिकिलोस ४० ते ४५ रुपये दर मिळत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. सदरच्या आर्थिक उलाढालीची गती महिनाभर राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कारण महाराष्ट्रातील टमाटा एक महिन्यानंतर उत्पादित होईल व तेव्हा परराज्यातील खरेदीदार महाराष्ट्राकडे वळतील. सद्यस्थितीत पडणारा पाऊस कृषी उत्पादनास विशेषत: टमाट्यास पोषक मानण्यात येत असल्याने तोपर्यंत महागड्या टमाट्याची चव चाखावी लागणार आहे. (वार्ताहर)