शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खरिपाच्या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:31 IST

नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देसंकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज

दत्ता दिघोळे ।नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.सध्या शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी व अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीनंतर अधून-मधून येणाऱ्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर सोयाबीन, मका, उडीद, मूग, टमाटे, कोबी व फ्लॉवर आदी पिके तग धरून होती. तसेच सोयाबीनसह पेरणी केलेल्या कडधान्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकºयांनी केलेला खर्चही पदरात पडला नसल्याने शेतकºयांच्या डोक्यावर आर्थिक बोजाचा भार वाढला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांतून सध्या शेतकरी मार्गक्रमण करत आहे. पावसाळा संपल्यात जमा झाला आहे. परतीच्या पावसाकडे नजरा लागल्या आहेत. मात्र अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले कोरडेठाक आहेत. शेतकरी येणाºया रब्बी हंगामासही मुकण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही येत्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. (क्रमश:) गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची सर्वच पिके पाण्याअभावी शेतातच करपून गेली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या मालास बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.पाण्याअभावी शेतकºयांकडून कांदा रोपांची विक्रीपाऊस सध्या परतीच्या प्रवासात आहे; मात्र तालुक्याच्या कोणत्याच भागावर तो अजूनही बरसला नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतकरीवर्ग अजूनही परतीच्या पावसाची आस धरून बसलेला आहे. अनेकांनी रब्बीच्या पिकांची लागवड पाणीटंचाई लक्षात घेता थांबवली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे लागवडीसाठी आलेल्या कांदा रोपांची विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.यंदा खरिपाच्या पिकांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा हे पीक पावसाअभावी शेतातच करपले. जेमतेम हाती आलेल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते तयार करण्यासाठीही शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.- एकनाथ सानप, शेतकरी, नायगाव