शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

खरिपाच्या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:31 IST

नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देसंकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज

दत्ता दिघोळे ।नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.सध्या शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी व अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीनंतर अधून-मधून येणाऱ्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर सोयाबीन, मका, उडीद, मूग, टमाटे, कोबी व फ्लॉवर आदी पिके तग धरून होती. तसेच सोयाबीनसह पेरणी केलेल्या कडधान्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकºयांनी केलेला खर्चही पदरात पडला नसल्याने शेतकºयांच्या डोक्यावर आर्थिक बोजाचा भार वाढला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांतून सध्या शेतकरी मार्गक्रमण करत आहे. पावसाळा संपल्यात जमा झाला आहे. परतीच्या पावसाकडे नजरा लागल्या आहेत. मात्र अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले कोरडेठाक आहेत. शेतकरी येणाºया रब्बी हंगामासही मुकण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही येत्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. (क्रमश:) गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची सर्वच पिके पाण्याअभावी शेतातच करपून गेली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या मालास बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.पाण्याअभावी शेतकºयांकडून कांदा रोपांची विक्रीपाऊस सध्या परतीच्या प्रवासात आहे; मात्र तालुक्याच्या कोणत्याच भागावर तो अजूनही बरसला नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतकरीवर्ग अजूनही परतीच्या पावसाची आस धरून बसलेला आहे. अनेकांनी रब्बीच्या पिकांची लागवड पाणीटंचाई लक्षात घेता थांबवली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे लागवडीसाठी आलेल्या कांदा रोपांची विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.यंदा खरिपाच्या पिकांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा हे पीक पावसाअभावी शेतातच करपले. जेमतेम हाती आलेल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते तयार करण्यासाठीही शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.- एकनाथ सानप, शेतकरी, नायगाव