शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:31 IST

नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देसंकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज

दत्ता दिघोळे ।नायगाव : खरीप पिकाची पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिसरात अद्यापपर्यंत एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी खरीप पीक शेतातच करपत असताना रब्बीच्याही आशा धूसर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.सध्या शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकरी वर्गाने खरिपाची पेरणी व अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीनंतर अधून-मधून येणाऱ्या रिमझिम पावसाच्या पाण्यावर सोयाबीन, मका, उडीद, मूग, टमाटे, कोबी व फ्लॉवर आदी पिके तग धरून होती. तसेच सोयाबीनसह पेरणी केलेल्या कडधान्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी शेतकºयांनी केलेला खर्चही पदरात पडला नसल्याने शेतकºयांच्या डोक्यावर आर्थिक बोजाचा भार वाढला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांतून सध्या शेतकरी मार्गक्रमण करत आहे. पावसाळा संपल्यात जमा झाला आहे. परतीच्या पावसाकडे नजरा लागल्या आहेत. मात्र अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले कोरडेठाक आहेत. शेतकरी येणाºया रब्बी हंगामासही मुकण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही येत्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. (क्रमश:) गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची सर्वच पिके पाण्याअभावी शेतातच करपून गेली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या मालास बाजारात मातीमोल भाव मिळत आहे.पाण्याअभावी शेतकºयांकडून कांदा रोपांची विक्रीपाऊस सध्या परतीच्या प्रवासात आहे; मात्र तालुक्याच्या कोणत्याच भागावर तो अजूनही बरसला नाही. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतकरीवर्ग अजूनही परतीच्या पावसाची आस धरून बसलेला आहे. अनेकांनी रब्बीच्या पिकांची लागवड पाणीटंचाई लक्षात घेता थांबवली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे लागवडीसाठी आलेल्या कांदा रोपांची विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.यंदा खरिपाच्या पिकांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतले जाते. यंदा हे पीक पावसाअभावी शेतातच करपले. जेमतेम हाती आलेल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याने ते तयार करण्यासाठीही शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.- एकनाथ सानप, शेतकरी, नायगाव