शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणांच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:17 IST

खामखेडा : गेल्या काही दिवसापासून शिवारात प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात कांदा बियाणाचे पीक दिसून येत आहे, परंतु चालू वर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या बियाणाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे.

ठळक मुद्दे कांदा बियाणात फसवणूक होऊ नये म्हणून स्वत: निर्मित कांदे बियाणे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गिरणा नदीच्या परिसरात लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे लागते. गेल्या

यामुळे कांद्याची गळती होत नाही आणि निघाला तर त्या कांद्याचा रंग भगवा किंवा निळा निघतो. या कांद्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकºयाची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. म्हणून प्रत्येक शेतकरी कांद्याच्या डोंगळ्यांची लागवड करतो.शेतकरी कांद्याच्या या डोंगळ्याची लागवड दसरा झाल्यानंतर करतो. मार्च महिन्यात तो परिपूर्ण तयार होतो. यासाठी चांगला आणि दर्जेदार कांदा निघण्यासाठी शेतकरी स्वत: कांद्याचे बियाणे लागवड करतो. यासाठी तो चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून त्या कांद्याला मध्यभागी कापून मुळाकडचा भाग जमिनीत एक फूट अंतरावर लागवड करतो. कांद्याला चांगला कलर यावा म्हणून या डोंगळ्यामध्ये झेंडूची तुरळक झाडे लावली जातात. त्यामुळे या झेंडूचे परागकण या कांद्याच्या डोंगळ्यावर पडून चांगले दर्जेदार बियाणे तयार होऊन लाल कांदा तयार होतो. या स्वयंनिर्मित कांद्याच्या बियाणांमुळे चांगल्या प्रतीचा कांदा तयार होतो. यामुळे बाजारभावही चांगला मिळतो, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत नाही.जी काही कांदा बियाणाची डोंगळे निघाली आहेत ती या वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात फुललेली नाहीत, तर काही डोंगळे फुलणे बाकी आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होतो की काय याची भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. जर यापुढे असे वातावरण राहिले तर पुढे कांद्याचे बियाणे कमी प्रमाणात तयार होतील, त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या बियाणांचा तुटवडा होणार आहे.