शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणांच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:17 IST

खामखेडा : गेल्या काही दिवसापासून शिवारात प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात कांदा बियाणाचे पीक दिसून येत आहे, परंतु चालू वर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या बियाणाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे.

ठळक मुद्दे कांदा बियाणात फसवणूक होऊ नये म्हणून स्वत: निर्मित कांदे बियाणे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गिरणा नदीच्या परिसरात लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे लागते. गेल्या

यामुळे कांद्याची गळती होत नाही आणि निघाला तर त्या कांद्याचा रंग भगवा किंवा निळा निघतो. या कांद्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकºयाची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होते. म्हणून प्रत्येक शेतकरी कांद्याच्या डोंगळ्यांची लागवड करतो.शेतकरी कांद्याच्या या डोंगळ्याची लागवड दसरा झाल्यानंतर करतो. मार्च महिन्यात तो परिपूर्ण तयार होतो. यासाठी चांगला आणि दर्जेदार कांदा निघण्यासाठी शेतकरी स्वत: कांद्याचे बियाणे लागवड करतो. यासाठी तो चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून त्या कांद्याला मध्यभागी कापून मुळाकडचा भाग जमिनीत एक फूट अंतरावर लागवड करतो. कांद्याला चांगला कलर यावा म्हणून या डोंगळ्यामध्ये झेंडूची तुरळक झाडे लावली जातात. त्यामुळे या झेंडूचे परागकण या कांद्याच्या डोंगळ्यावर पडून चांगले दर्जेदार बियाणे तयार होऊन लाल कांदा तयार होतो. या स्वयंनिर्मित कांद्याच्या बियाणांमुळे चांगल्या प्रतीचा कांदा तयार होतो. यामुळे बाजारभावही चांगला मिळतो, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत नाही.जी काही कांदा बियाणाची डोंगळे निघाली आहेत ती या वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात फुललेली नाहीत, तर काही डोंगळे फुलणे बाकी आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होतो की काय याची भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. जर यापुढे असे वातावरण राहिले तर पुढे कांद्याचे बियाणे कमी प्रमाणात तयार होतील, त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या बियाणांचा तुटवडा होणार आहे.