शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कोरोनामुळे क्षयरुग्ण निदान संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे शहरातील नोंदणीकृत क्षयरुग्ण निदानाची संख्या कमी झाल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाचे क्षयरोग विभागप्रमुख डॉ. अमोल दुसाने यांनी केला आहे. मालेगाव येथे जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात १ हजार ४०४ क्षयरुग्ण सापडले होते, त्यात ६१६ जणांनी खासगी रुग्णालयात तर ७८८ जणांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले होते. गेल्यावर्षी २०२०मध्ये त्या तुलनेत ३५१ रुग्ण घटल्याचे समोर आले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये नोंदणीकृत एकूण १,०५३ क्षयरुग्णांचे निदान झाले. त्यात सरकारी दवाखान्यात ६३० तर खासगी रुग्णालयातून आलेल्या ४२३ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले. यावर्षी २०२१मध्ये मार्चपर्यंत २९१ क्षयरुग्ण सापडले आहेत. त्यातील सरकारी दवाखान्यात १५५ तर खासगी रुग्णालयातून आलेल्या १३६ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले.

कोरोना परिस्थितीचा नोंदणीकृत क्षयरुग्णांच्या संख्येवर निश्चितच परिणाम झाल्याचे २०२०च्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. हा परिणाम पूर्ण देशात व राज्यातही झालेला दिसून येतो. तरीही २०२०च्या कोविड-१९ तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीतही मालेगाव महानगरपालिका हद्दीतील निदानाच्या व उपचाराच्या सुविधा मिळण्यासाठी शक्य तेवढी पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

इन्फो...

मृत्यूदरात वाढ, घट नाही

क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात कुठल्याही प्रकारची वाढ अथवा घट कोरोना कारणांमुळे आढळून आली नाही. हे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचाराची सोय डॉट्स प्लस साईट डॉ. वसंतराव पवार आडगाव मेडिकल कॉलेज, नाशिक येथे करण्यात आली होती. मागील वर्षी उपचार करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारण लॉकडाऊनमुळे रुग्ण दवाखान्यात येण्यास घाबरत होते. अशावेळी शहर क्षयरोग सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच जणांना डॉट्स उपचार त्यांच्या घरी जाऊन दिला. काही रुग्णांचे थुंकी नमुने हे मुंबई अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. परंतु, ट्रान्सपोर्ट सुविधा बंद असल्यामुळे यातही अडथळे निर्माण झाले होते, यातून मार्ग काढत हे नमुने वेगळ्या पॅकिंगमधून रोज कोविड टेस्टिंगसाठी नमुने घेऊन जाणाऱ्या व्हॅनमधूनही पाठविण्यात आले. मालेगाव शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटीमध्ये आजघडीला १६ कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच आणखी दोन जागा भरल्या जाणार आहेत.

इन्फो...

रूग्णांसाठी आवाहन

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणांपैकी एकही लक्षण असल्यास त्यांनी आपली तपासणी कुठलीही भीती न बाळगता वेळीच डॉक्टरांकडून करून घ्यावी. क्षयरोगाचे निदान झाल्यास घाबरू नये व त्याचा उपचार पूर्ण करावा. पूर्ण उपचार केल्यास खात्रीने रुग्ण पूर्णपणे बरा होतो. उपचार सुरु असताना काही त्रास झाल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी व त्यावरील उपचार करून घ्यावे. परंतु, क्षयरोगाचे उपचार बंद करू नयेत. उपचार अर्धवट सोडल्यास गुंतागुंतीच्या प्रकाराचा क्षयरोग होऊ शकतो. मधुमेह व एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आढळते.