शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मालेगावी कोरोनामुळे क्षयरुग्ण निदान संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने शिरकाव केल्याने बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे शहरातील नोंदणीकृत क्षयरुग्ण निदानाची संख्या कमी झाल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाचे क्षयरोग विभागप्रमुख डॉ. अमोल दुसाने यांनी केला आहे. मालेगाव येथे जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात १ हजार ४०४ क्षयरुग्ण सापडले होते, त्यात ६१६ जणांनी खासगी रुग्णालयात तर ७८८ जणांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले होते. गेल्यावर्षी २०२०मध्ये त्या तुलनेत ३५१ रुग्ण घटल्याचे समोर आले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये नोंदणीकृत एकूण १,०५३ क्षयरुग्णांचे निदान झाले. त्यात सरकारी दवाखान्यात ६३० तर खासगी रुग्णालयातून आलेल्या ४२३ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले. यावर्षी २०२१मध्ये मार्चपर्यंत २९१ क्षयरुग्ण सापडले आहेत. त्यातील सरकारी दवाखान्यात १५५ तर खासगी रुग्णालयातून आलेल्या १३६ जणांवर मनपा क्षयरोग विभागाने उपचार केले.

कोरोना परिस्थितीचा नोंदणीकृत क्षयरुग्णांच्या संख्येवर निश्चितच परिणाम झाल्याचे २०२०च्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. हा परिणाम पूर्ण देशात व राज्यातही झालेला दिसून येतो. तरीही २०२०च्या कोविड-१९ तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीतही मालेगाव महानगरपालिका हद्दीतील निदानाच्या व उपचाराच्या सुविधा मिळण्यासाठी शक्य तेवढी पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

इन्फो...

मृत्यूदरात वाढ, घट नाही

क्षयरुग्णांच्या मृत्यूदरात कुठल्याही प्रकारची वाढ अथवा घट कोरोना कारणांमुळे आढळून आली नाही. हे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचाराची सोय डॉट्स प्लस साईट डॉ. वसंतराव पवार आडगाव मेडिकल कॉलेज, नाशिक येथे करण्यात आली होती. मागील वर्षी उपचार करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारण लॉकडाऊनमुळे रुग्ण दवाखान्यात येण्यास घाबरत होते. अशावेळी शहर क्षयरोग सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच जणांना डॉट्स उपचार त्यांच्या घरी जाऊन दिला. काही रुग्णांचे थुंकी नमुने हे मुंबई अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. परंतु, ट्रान्सपोर्ट सुविधा बंद असल्यामुळे यातही अडथळे निर्माण झाले होते, यातून मार्ग काढत हे नमुने वेगळ्या पॅकिंगमधून रोज कोविड टेस्टिंगसाठी नमुने घेऊन जाणाऱ्या व्हॅनमधूनही पाठविण्यात आले. मालेगाव शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटीमध्ये आजघडीला १६ कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच आणखी दोन जागा भरल्या जाणार आहेत.

इन्फो...

रूग्णांसाठी आवाहन

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणांपैकी एकही लक्षण असल्यास त्यांनी आपली तपासणी कुठलीही भीती न बाळगता वेळीच डॉक्टरांकडून करून घ्यावी. क्षयरोगाचे निदान झाल्यास घाबरू नये व त्याचा उपचार पूर्ण करावा. पूर्ण उपचार केल्यास खात्रीने रुग्ण पूर्णपणे बरा होतो. उपचार सुरु असताना काही त्रास झाल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी व त्यावरील उपचार करून घ्यावे. परंतु, क्षयरोगाचे उपचार बंद करू नयेत. उपचार अर्धवट सोडल्यास गुंतागुंतीच्या प्रकाराचा क्षयरोग होऊ शकतो. मधुमेह व एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आढळते.