शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मानोरीत शासकीय कार्यालये झाल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:11 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.

मानोरी : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ काहीशी कमी व्हावी यासाठी येथील एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक अशा तीन शासकीय कार्यालयांची एकाच जागेवर भव्य उभारणी केली आहे, परंतु ग्रामपंचायत कार्यालय वगळता तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक कार्यालय इमारत बांधल्यापासून जवळपास पाच वर्षांपासून दोन्ही कार्यालये कुलूप लावलेल्या अवस्थेत आहे. एकदाही या कार्यालयात अधिकारी येत नसल्याने दोन्ही कार्यालये केवळ शोभेच्या वस्तू म्हणून बांधल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुकच्या शेतकऱ्यांना तलाठी सजा कार्यालय म्हणून देशमाने येथील कार्यालयात सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी देशमाने येथे जावे लागत आहे. मागील दीड वर्षापासून देशमाने तलाठी कार्यालयाचा बोजवारा उडाला असून, तलाठ्याअभावी देशमाने सजा अंतर्गत देशमाने खुर्द, देशमाने बुद्रुक, मानोरी बुद्रुक ही तीन गावे असून, सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी त्रास होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  मानोरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तरी तलाठी यावा, जेणेकरून शेतकºयांना सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी धावपळ होणार नाही व देशमाने येथे हेलपाटे पण मारावे लागणार नाही. त्यामुळे मानोरी बुद्रुक येथे तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मानोरी बुद्रुक येथे जवळपास चारशे शेतकरी खातेदार असून, देशमाने कार्यालयात तलाठी कधी येतात ? हे माहीत नसल्याने शेतकरीवर्ग अर्धा दिवस तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसून राहत आहे. मानोरी हे अंतर तीन किलोमीटर असल्याने या रस्त्याला आधीच वाहनांची गैरसोय असल्याने देशमानेला जाणेही काहींना कठीण होत आहे. एकीकडे आॅनलाइन उतारा कुठे मिळतो तर कुठे मिळत नाही, आणि मिळाला तरी त्यावर सही घेण्यासाठी तब्बल दहा-बारा दिवसांनी एकदा तलाठी येऊन सही केल्यावर मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास विलंब होत आहे. येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे हे येवला तालुक्यातील पुरणगाव व मानोरी अशा दोन गावांचे कामकाज बघत आहे. मग तलाठी दोन गावांचे कामकाज बघू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार