शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मानोरीत शासकीय कार्यालये झाल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:11 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.

मानोरी : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ काहीशी कमी व्हावी यासाठी येथील एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक अशा तीन शासकीय कार्यालयांची एकाच जागेवर भव्य उभारणी केली आहे, परंतु ग्रामपंचायत कार्यालय वगळता तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक कार्यालय इमारत बांधल्यापासून जवळपास पाच वर्षांपासून दोन्ही कार्यालये कुलूप लावलेल्या अवस्थेत आहे. एकदाही या कार्यालयात अधिकारी येत नसल्याने दोन्ही कार्यालये केवळ शोभेच्या वस्तू म्हणून बांधल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुकच्या शेतकऱ्यांना तलाठी सजा कार्यालय म्हणून देशमाने येथील कार्यालयात सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी देशमाने येथे जावे लागत आहे. मागील दीड वर्षापासून देशमाने तलाठी कार्यालयाचा बोजवारा उडाला असून, तलाठ्याअभावी देशमाने सजा अंतर्गत देशमाने खुर्द, देशमाने बुद्रुक, मानोरी बुद्रुक ही तीन गावे असून, सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी त्रास होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  मानोरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तरी तलाठी यावा, जेणेकरून शेतकºयांना सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी धावपळ होणार नाही व देशमाने येथे हेलपाटे पण मारावे लागणार नाही. त्यामुळे मानोरी बुद्रुक येथे तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मानोरी बुद्रुक येथे जवळपास चारशे शेतकरी खातेदार असून, देशमाने कार्यालयात तलाठी कधी येतात ? हे माहीत नसल्याने शेतकरीवर्ग अर्धा दिवस तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसून राहत आहे. मानोरी हे अंतर तीन किलोमीटर असल्याने या रस्त्याला आधीच वाहनांची गैरसोय असल्याने देशमानेला जाणेही काहींना कठीण होत आहे. एकीकडे आॅनलाइन उतारा कुठे मिळतो तर कुठे मिळत नाही, आणि मिळाला तरी त्यावर सही घेण्यासाठी तब्बल दहा-बारा दिवसांनी एकदा तलाठी येऊन सही केल्यावर मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास विलंब होत आहे. येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे हे येवला तालुक्यातील पुरणगाव व मानोरी अशा दोन गावांचे कामकाज बघत आहे. मग तलाठी दोन गावांचे कामकाज बघू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार