शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मानोरीत शासकीय कार्यालये झाल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:11 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.

मानोरी : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे जनसुविधा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करून सन २०१३ मध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ काहीशी कमी व्हावी यासाठी येथील एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक अशा तीन शासकीय कार्यालयांची एकाच जागेवर भव्य उभारणी केली आहे, परंतु ग्रामपंचायत कार्यालय वगळता तलाठी कार्यालय आणि कृषी सहायक कार्यालय इमारत बांधल्यापासून जवळपास पाच वर्षांपासून दोन्ही कार्यालये कुलूप लावलेल्या अवस्थेत आहे. एकदाही या कार्यालयात अधिकारी येत नसल्याने दोन्ही कार्यालये केवळ शोभेच्या वस्तू म्हणून बांधल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुकच्या शेतकऱ्यांना तलाठी सजा कार्यालय म्हणून देशमाने येथील कार्यालयात सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी देशमाने येथे जावे लागत आहे. मागील दीड वर्षापासून देशमाने तलाठी कार्यालयाचा बोजवारा उडाला असून, तलाठ्याअभावी देशमाने सजा अंतर्गत देशमाने खुर्द, देशमाने बुद्रुक, मानोरी बुद्रुक ही तीन गावे असून, सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी त्रास होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  मानोरी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तरी तलाठी यावा, जेणेकरून शेतकºयांना सात बारा, खाते उतारा, ६ ड च्या नोंदी मिळविण्यासाठी धावपळ होणार नाही व देशमाने येथे हेलपाटे पण मारावे लागणार नाही. त्यामुळे मानोरी बुद्रुक येथे तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मानोरी बुद्रुक येथे जवळपास चारशे शेतकरी खातेदार असून, देशमाने कार्यालयात तलाठी कधी येतात ? हे माहीत नसल्याने शेतकरीवर्ग अर्धा दिवस तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसून राहत आहे. मानोरी हे अंतर तीन किलोमीटर असल्याने या रस्त्याला आधीच वाहनांची गैरसोय असल्याने देशमानेला जाणेही काहींना कठीण होत आहे. एकीकडे आॅनलाइन उतारा कुठे मिळतो तर कुठे मिळत नाही, आणि मिळाला तरी त्यावर सही घेण्यासाठी तब्बल दहा-बारा दिवसांनी एकदा तलाठी येऊन सही केल्यावर मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास विलंब होत आहे. येथे कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे हे येवला तालुक्यातील पुरणगाव व मानोरी अशा दोन गावांचे कामकाज बघत आहे. मग तलाठी दोन गावांचे कामकाज बघू शकत नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार