शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्तीची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे.

इंदिरानगर : नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने नाशिक हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा कोणत्या निकषावर ठरविण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्यापही बहुतेक झोपडपट्टी परिसरात सर्रासपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणूून शंभरफुटी रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावरून दिवसभर वाहनाची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सकाळ आणि सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी परिसरातील काही रहिवासी राजीवनगर झोपडपट्टी ते पिंगळेचौक आणि वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील रस्त्यावर सर्रासपणे उघड्यावर शौचास बसतात. तसेच भारतनगरलगत असलेल्या घरकुल योजनेलगतच्या रस्त्यावरही उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच मार्गक्रमण करणाºयांना नाक दाबून ये-जा करावे लागते. तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न अद्यापही काही सुटत नाही. तरीही नाशिक हगणदारीमुक्त घोषणा कसे झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.