शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

सहा नगरपंचायतींत आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:17 IST

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकळवण, पेठ, देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाडसह दिंडोरीत सत्तांतराची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कळवण : येथील नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला मिळाले नव्हते, मात्र यंदा राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजप ४, काँग्रेस ३, शिवसेना १ तर अपक्षांनी २ जागांवर विजय मिळविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, अपक्ष असा महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कळवणमध्ये करून पाच वर्षे सत्ता टिकवून शहरातील रस्त्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहरात १०० कोटी रुपयांची विकासकामे केली, त्यात शहरासाठी २५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. १७ प्रभागात रस्ते, पाणी, गटार, पथदीप आदी विकासकामांना प्राधान्य दिले. प्रभाग क्र. ७ मधून राष्ट्रवादीच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. ११ मधून भाजपने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादीच्या हर्षदा पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. १२ मधून चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या बाजूने पडल्यामुळे ते बिनविरोध झाले. विकासकामांच्या जोरावर आघाडीने पुन्हा कळवणकरांकडे कौल मागितला असून, तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे आघाडीने सत्तेकडे कूच केली आहे. आघाडीकडे सत्ता देण्याचा कळवणकरांचा एकंदरीत कौल आहे.पक्षांतराचे वारेकाँग्रेसच्या रोहिणी महाले यांनी शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग ६ मधून उमेदवारी केली, तर राष्ट्रवादीच्या तेजस जाधव यांनी प्रभाग ३ मधून भाजपची उमेदवारी केली.सुरगाण्यात त्रिशंकू स्थितीनगरपंचात निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि.१९) लागणार असल्याने मातब्बर उमेदवारांमध्ये हुरहूर लागली असून, काय निकाल येतो याची उत्सुकता शहरासह तालुक्यात लागली आहे. यावेळच्या निवडणुकीत बहुमत कुणाएका पक्षाला मिळणार नाही, असा अंदाज आहे. भाजप, शिवसेना व माकपाचे उमेदवार कमी अधिक फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी एका जागेवर विजय प्राप्त करेल, असा कयास आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सात जागांवर विजय मिळविला होता. तीच पुनरावृत्ती भाजप यंदाही करेल असाही अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक