शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सहा नगरपंचायतींत आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:17 IST

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकळवण, पेठ, देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाडसह दिंडोरीत सत्तांतराची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कळवण : येथील नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला मिळाले नव्हते, मात्र यंदा राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजप ४, काँग्रेस ३, शिवसेना १ तर अपक्षांनी २ जागांवर विजय मिळविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, अपक्ष असा महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कळवणमध्ये करून पाच वर्षे सत्ता टिकवून शहरातील रस्त्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहरात १०० कोटी रुपयांची विकासकामे केली, त्यात शहरासाठी २५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. १७ प्रभागात रस्ते, पाणी, गटार, पथदीप आदी विकासकामांना प्राधान्य दिले. प्रभाग क्र. ७ मधून राष्ट्रवादीच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. ११ मधून भाजपने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादीच्या हर्षदा पगार बिनविरोध झाल्या. प्रभाग क्र. १२ मधून चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या तेजस पगार यांच्या बाजूने पडल्यामुळे ते बिनविरोध झाले. विकासकामांच्या जोरावर आघाडीने पुन्हा कळवणकरांकडे कौल मागितला असून, तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे आघाडीने सत्तेकडे कूच केली आहे. आघाडीकडे सत्ता देण्याचा कळवणकरांचा एकंदरीत कौल आहे.पक्षांतराचे वारेकाँग्रेसच्या रोहिणी महाले यांनी शिवसेनेत प्रवेश करून प्रभाग ६ मधून उमेदवारी केली, तर राष्ट्रवादीच्या तेजस जाधव यांनी प्रभाग ३ मधून भाजपची उमेदवारी केली.सुरगाण्यात त्रिशंकू स्थितीनगरपंचात निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि.१९) लागणार असल्याने मातब्बर उमेदवारांमध्ये हुरहूर लागली असून, काय निकाल येतो याची उत्सुकता शहरासह तालुक्यात लागली आहे. यावेळच्या निवडणुकीत बहुमत कुणाएका पक्षाला मिळणार नाही, असा अंदाज आहे. भाजप, शिवसेना व माकपाचे उमेदवार कमी अधिक फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी एका जागेवर विजय प्राप्त करेल, असा कयास आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सात जागांवर विजय मिळविला होता. तीच पुनरावृत्ती भाजप यंदाही करेल असाही अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक