शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पुरवठा खात्याचा निर्णय : मात्र ओळखीचा द्यावा लागणार पुरावा आधार नसल्यावरही मिळणार रेशनमधून धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:37 IST

नाशिक : ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने ओळखीचा कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देत्याचा लाभ नाशिकसह २५ जिल्ह्यांना होणार मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी

नाशिक : शिधापत्रिकेला आधार जोडल्याशिवाय रेशनमधून धान्य न देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे निकाल दिला असला तरी, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने आपल्या ओळखीचा अन्य कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला असल्याने त्याचा लाभ नाशिकसह २५ जिल्ह्यांना होणार आहे. तथापि, आठ जिल्ह्यांमध्ये मात्र प्रायोगिक पातळीवर १ मार्चपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला आळा बसावा व पारदर्शी कामकाजासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘बायोमेट्रिक’ प्रणालीवर आधारित ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य विक्रीला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने या यंत्रणेच्या आधारे केल्या जाणाºया धान्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी अद्यापही कायम असून, त्याचा फटका रेशन दुकानदाराला बसत असला तरी, सरकारने त्यात सुधारणा करण्याचे मान्य करून हीच प्रणाली यापुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे किंबहुना शिधापत्रिकेवर नाव असलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय यापुढे धान्य न देण्याचे ठरविले आहे. शासनाने मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी केली होती, परंतु राज्यातील बºयाचशा जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरवठा खात्याकडून आधार सिडिंगचे कामकाज पूर्ण झालेले नाही. त्यातच आधार अद्ययावत करण्याच्या नावाखाली अनेक शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंकिंग होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे १ मार्च २०१८ पासून अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या आठ ठिकाणी ‘एइपीडीएस’प्रणालीद्वारे म्हणजेच आधार जोडणी असल्याशिवाय धान्य देण्यात येणार नाही, परंतु महाराष्टÑात नाशिकसह अन्य जिल्ह्णांत मात्र पूर्वीच्याच पद्धतीने ‘पॉस’ यंत्राच्या साहाय्याने धान्य वितरण करण्यास मुभा दिली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाला मात्र रेशन दुकानदाराकडे ओळखीचा अन्य पुरावा सादर करावा लागणार आहे व त्याची खात्री पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत केली जाणार आहे.