शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यातील निर्बंधाबाबत आज निर्णय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:33 IST

जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देदिलासा की निर्बंध: मुख्यमंत्र्यांचा टास्क फोर्सकडे सर्वांचे लक्ष

नाशिक: जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २३ तारखेला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या काेरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबतची चर्चा झाली होती. निर्बंधात शिथिलता मिळावी, अशी मागणी अनेक व्यापारी संघटनांसह व्यावसायिकांकडून होत असल्याने, त्यांच्या मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी राज्य शासनाकडे शिथिलतेबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने, शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून तरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे पाठविला आहे. या पथकाची गुरुवारी मुंबईत बैठक होणार असून, शिथिलता देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली, तर पुढील सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवली जातात. या दोन्हीपैकी एक दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी किंवा बाजारपेठेतील दुकानांची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी वाढवून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सला असल्याने, त्यांच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून असणार.

--इन्फो--

एखादा तास दिलासा शक्य

वीकेंड लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने, जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे, परंतु काहीशी शिथिलता देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ ऐवजी ५ वाजेपर्यंत होऊ शकते. टास्क फोर्स नेमका काय निर्णय घेणार, यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या