शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

By admin | Updated: June 4, 2017 02:53 IST

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत यापुढे संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भाजपाच्या खासदार व आमदारांना शेतकऱ्यांनी चर्चा न करताच पिटाळून लावले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नाशिकच्या शेतकरी नेत्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत काही शेतकरी नेत्यांची झालेली बैठक व त्यातून संपाबाबत पुढील भूमिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. जयराज सुर्यवंशी यांना संप मागे घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत सूर्यवंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याच वेळी बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान सुरू करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी संपामुळे दुकान बंद करण्याचे आवाहन केले. तथापि, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असून, मी पैसे देऊन शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा दुकानातील शेतमाल फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या विरोधात शेतकरी व कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केली.