शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

By admin | Updated: June 4, 2017 02:53 IST

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत यापुढे संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भाजपाच्या खासदार व आमदारांना शेतकऱ्यांनी चर्चा न करताच पिटाळून लावले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नाशिकच्या शेतकरी नेत्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत काही शेतकरी नेत्यांची झालेली बैठक व त्यातून संपाबाबत पुढील भूमिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. जयराज सुर्यवंशी यांना संप मागे घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत सूर्यवंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याच वेळी बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान सुरू करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी संपामुळे दुकान बंद करण्याचे आवाहन केले. तथापि, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असून, मी पैसे देऊन शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा दुकानातील शेतमाल फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या विरोधात शेतकरी व कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केली.