शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

By admin | Updated: June 4, 2017 02:53 IST

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत यापुढे संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भाजपाच्या खासदार व आमदारांना शेतकऱ्यांनी चर्चा न करताच पिटाळून लावले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नाशिकच्या शेतकरी नेत्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत काही शेतकरी नेत्यांची झालेली बैठक व त्यातून संपाबाबत पुढील भूमिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. जयराज सुर्यवंशी यांना संप मागे घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत सूर्यवंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याच वेळी बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान सुरू करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी संपामुळे दुकान बंद करण्याचे आवाहन केले. तथापि, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असून, मी पैसे देऊन शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा दुकानातील शेतमाल फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या विरोधात शेतकरी व कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केली.