शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

संस्थाचालकांच्या बैठकीत जुलैपासून शाळा  बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:07 IST

सरकारने शिक्षण संस्थाचालकांसोबतच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या जून महिन्यापर्यंत मान्य न केल्यास १ जुलैपासून राज्यातील १५ हजार शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा ठराव संस्थाचालक महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील संस्थाचालक व शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी एकत्रित येऊन पालक-शिक्षक संघटनांनाही सोबत घेत सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नाशिक : सरकारने शिक्षण संस्थाचालकांसोबतच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या जून महिन्यापर्यंत मान्य न केल्यास १ जुलैपासून राज्यातील १५ हजार शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा ठराव संस्थाचालक महामंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील संस्थाचालक व शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी एकत्रित येऊन पालक-शिक्षक संघटनांनाही सोबत घेत सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाची बुधवारी (दि. २८) नाशिकमध्ये बैठक पार पडली. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, सचिव ए. पी. जवळकर, संघटक रवींद्र फडणवीस यांसह राज्यातील ४० वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. शिक्षण संस्थांना भेडसावणाºया समस्यांविषयी संस्थाचालकांनी यावेळी विचारमंथन केले. शिक्षकांना १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर निवडश्रेणी लागू होते. त्यामुळे या वेतनश्रेणी देण्यासाठी शासनाने लादलेल्या अटी हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शाळांना २० टक्के अनुदानाचे वाटप करावे, संस्थांना वेतनेतर अनुदान मिळावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासोबत संस्थाचालक व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. सरकार शिक्षक किंवा संस्थाचालकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न देता केवळ आश्वासने देऊन वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सर्व संस्थाचालक व कर्मचारी संघटनांनी एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एप्रिल महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक व्यासपीठ स्थापन करून १ जुलैपासून सर्व शाळा बंदचा ठराव करण्यात येणार आहे. हा ठराव शिक्षणसंस्था महामंडळाकडे पाठविण्यात येणार असून, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जूनपर्यंत सरकारने महामंडळाच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या शैक्षणिक वर्षात १ जुलैपासून राज्यातील १५ हजार शिक्षणसंस्था त्यांची शाळा, महाविद्यालये बंद ठेवणार असल्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. संस्थाचालकांनी या ठरावास अनुमोदन दिल्यामुळे शिक्षण मंत्र्यांपुढील प्रश्न वाढण्याची शक्यता आहे. यावेळी अ‍ॅड. किरण सरनाईक , अनिल शिंदे, मिलिंद पाटील, वाल्मीक सुरासे, श्रीपदभाई पटेल आदी उपस्थित होते.शिक्षण विभागावर बोचरी टीकाशिक्षण विभागाचा सर्व कारभार शासननिर्णयावर आधारित सुरू आहे. संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांशी निगडित घेतलेले निर्णय किंवा ठरविलेल्या धोरणांविषयी सरकारने गेल्या वर्षभरात सुमारे ५२६ शासननिर्णय प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे, सॅनेटरी नॅपकिनचे किती वाटप झाले याविषयी माहिती मागविण्यासाठी सरकारने स्वतंत्र जीआर काढल्याची टीकाही माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा