शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

निमाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:01 IST

नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवाद पेटणार : विश्वस्त मंडळाने नेमली कार्यकारी समिती

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून निमा विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत शुक्रवारी (दि.३१) रोजी संपुष्टात येणार असल्याने विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निमाच्या घटनेतील कलम ३४.१ व ३४.४ नुसार विशेष कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांची, तर सरचिटणीसपदी आशिष नहार आणि खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग उपस्थित होते. या बैठकीला निमंत्रित सदस्य असलेले विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण अनुपस्थित राहिलेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समिती रविवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार निमाची निवडणूक स्थगित झाल्याने विद्यमान पदाधिकाºयांकडे काळजी वाहू पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांकडे हा निर्णय प्रलंबित आहे.

निमा विश्वस्त मंडळाने एकाधिकारशाहीचा वापर करून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे निमाची बदनामी होत आहे. हा वाद एकोप्याने मिटविणे आवश्यक आहे. वाद मिटणार नसेल तर विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निमातून बाहेर पडावे आणि राजकारण थांबवावे.सुधाकर देशमुख, सचिव, निमा

टॅग्स :businessव्यवसाय