शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

निमाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:01 IST

नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवाद पेटणार : विश्वस्त मंडळाने नेमली कार्यकारी समिती

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून निमा विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत शुक्रवारी (दि.३१) रोजी संपुष्टात येणार असल्याने विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निमाच्या घटनेतील कलम ३४.१ व ३४.४ नुसार विशेष कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांची, तर सरचिटणीसपदी आशिष नहार आणि खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग उपस्थित होते. या बैठकीला निमंत्रित सदस्य असलेले विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण अनुपस्थित राहिलेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समिती रविवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार निमाची निवडणूक स्थगित झाल्याने विद्यमान पदाधिकाºयांकडे काळजी वाहू पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांकडे हा निर्णय प्रलंबित आहे.

निमा विश्वस्त मंडळाने एकाधिकारशाहीचा वापर करून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे निमाची बदनामी होत आहे. हा वाद एकोप्याने मिटविणे आवश्यक आहे. वाद मिटणार नसेल तर विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निमातून बाहेर पडावे आणि राजकारण थांबवावे.सुधाकर देशमुख, सचिव, निमा

टॅग्स :businessव्यवसाय