शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

निमाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:01 IST

नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवाद पेटणार : विश्वस्त मंडळाने नेमली कार्यकारी समिती

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून निमा विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत शुक्रवारी (दि.३१) रोजी संपुष्टात येणार असल्याने विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निमाच्या घटनेतील कलम ३४.१ व ३४.४ नुसार विशेष कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांची, तर सरचिटणीसपदी आशिष नहार आणि खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग उपस्थित होते. या बैठकीला निमंत्रित सदस्य असलेले विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण अनुपस्थित राहिलेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समिती रविवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार निमाची निवडणूक स्थगित झाल्याने विद्यमान पदाधिकाºयांकडे काळजी वाहू पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांकडे हा निर्णय प्रलंबित आहे.

निमा विश्वस्त मंडळाने एकाधिकारशाहीचा वापर करून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे निमाची बदनामी होत आहे. हा वाद एकोप्याने मिटविणे आवश्यक आहे. वाद मिटणार नसेल तर विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निमातून बाहेर पडावे आणि राजकारण थांबवावे.सुधाकर देशमुख, सचिव, निमा

टॅग्स :businessव्यवसाय