शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

अनुकंपा तत्त्वावरील भरतीला पालिकेच्या निर्णयाचा अडसर

By admin | Updated: May 8, 2015 23:47 IST

४२ प्रकरणे प्रलंबित : नियमांना दिली तिलांजली

नाशिक : सेवेत असताना कुणी कर्मचारी मयत झाला तर अनुकंपा तत्त्वावर मयताच्या वारसाला सेवेत घेण्याची तरतूद आहे. नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के जागांवर अनुकंपा तत्त्वावर भरतीप्रक्रिया राबविता येते; परंतु नाशिक महापालिकेत गेल्या काही वर्षांत या नियमाला तिलांजली देत रिक्त जागांवर भरतीप्रक्रिया राबविण्याचे निर्णय प्रशासनाकडून घेतले गेल्याने आजमितीला अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ४२ प्रकरणे प्रलंबित आहेत. पालिकेच्याच तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम डावलून घेतलेल्या निर्णयांमुळे ४२ वारसांना नोकरीची प्रतीक्षा करावी लागते आहे.महापालिकेत नोकरभरतीला शासनाची मनाई आहे. याशिवाय महापालिकेचा आस्थापना खर्चही ३८ टक्क्यांवर असल्याने महापालिकेला नव्याने नोकरभरती करता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनावर सुमारे १३०० पदे रिक्त आहेत. याचबरोबर दर महिन्याला सुमारे १० ते १५ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने वर्षाला सुमारे १२५ ते १५० कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. या सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के कर्मचारी हे अनुकंपा तत्त्वावर भरण्यासंबंधीचा नियम आहे. परंतु गेल्या काही वर्षांत महापालिकेत प्रशासनाकडून या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येऊन रिक्त होणाऱ्या जागांवर भरती केली गेली. त्यात मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याबाबत फारसा विचार झाला नसल्याने अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे. आजमितीला ४२ प्रकरणे महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. रिक्त जागाच नसल्याने या प्रकरणांची फाईलच पुढे सरकत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर सेवेत जाण्यासाठी संबंधित उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे. या आधी मनपा आयुक्तांनी अनुकंपा तत्त्वावरील भरती त्वरित केली जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे या उमेदवारांना आशा लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)