शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: September 20, 2015 22:40 IST

कळवण : सदगुरू गजानन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांची माहिती

कळवण : $ग्रामीण व शहरी भागात पतसंस्था उघडल्यानंतर त्या शासनाचा अंगीकृत एक भाग आहे असे समजून नागरिक आपल्या ठेवी ठेवतात, अडचणीत आलेल्या संस्थांमुळे ठेवीदार अडचणीत येतात त्यामुळे आता नागरिकांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार येत्या दोन महिन्यात पतसंस्थांसाठी नवीन धोरण आखत असून, कॅरीबॅगमधील ५० हजारांहून अधिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.कळवण येथील श्री सदगुरु गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद््घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री सदगुरू गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन महंत रामलखनदास महाराज यांच्या हस्ते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, कळवणचे माजी सरपंच अ‍ॅड. परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, यादवराव पवार व अशोक पवार आदि प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, संचालक प्रकाश अहिरराव, प्रवीण कोठावदे, कैलास खैरनार, अरविंद कोठावदे, प्रशांत पगार आदिंसह संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दादा भुसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पतसंस्थांकडे बघायचा हेतू बदलत चाललेला असताना कळवणसारख्या तालुक्यात पतसंस्था वाढीस लागत असून, कळवणमध्ये पतसंस्था व बँका यांचे कामकाज खरोखरच कौतुकास्पद आहे़ मूठभर लोकांनी सहकार बदनाम करून भ्रष्टाचार केला अशा लोकांना खड्यासारखे दूर करून सहकारात चांगल्या लोकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले़ राज्यात तीन लाख २० हजार सहकारी संस्था असून, ज्या स्थापन झाल्या आहेत, त्या उदिष्टेप्रमाणे काम करत नसणाऱ्या ५० हजारांहून अधिक कागदोपत्री असलेल्या कॅरीबॅगमधील संस्था बंद करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले़ खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कागदावरील संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार जे.पी. गावित यांनी वसाका पुनर्जीवित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे यांनी केले. यावेळी परशुराम पगार, के. के. शिंदे, किशोर पगार हिरामण पगार, नंदकुमार खैरनार, मोहनलाल संचेती, नितीन वालखडे, प्रवीण संचेती व पतसंस्थेचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते. (वार्ताहर)