शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: September 20, 2015 22:40 IST

कळवण : सदगुरू गजानन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांची माहिती

कळवण : $ग्रामीण व शहरी भागात पतसंस्था उघडल्यानंतर त्या शासनाचा अंगीकृत एक भाग आहे असे समजून नागरिक आपल्या ठेवी ठेवतात, अडचणीत आलेल्या संस्थांमुळे ठेवीदार अडचणीत येतात त्यामुळे आता नागरिकांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार येत्या दोन महिन्यात पतसंस्थांसाठी नवीन धोरण आखत असून, कॅरीबॅगमधील ५० हजारांहून अधिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.कळवण येथील श्री सदगुरु गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद््घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री सदगुरू गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन महंत रामलखनदास महाराज यांच्या हस्ते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, कळवणचे माजी सरपंच अ‍ॅड. परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, यादवराव पवार व अशोक पवार आदि प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, संचालक प्रकाश अहिरराव, प्रवीण कोठावदे, कैलास खैरनार, अरविंद कोठावदे, प्रशांत पगार आदिंसह संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दादा भुसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पतसंस्थांकडे बघायचा हेतू बदलत चाललेला असताना कळवणसारख्या तालुक्यात पतसंस्था वाढीस लागत असून, कळवणमध्ये पतसंस्था व बँका यांचे कामकाज खरोखरच कौतुकास्पद आहे़ मूठभर लोकांनी सहकार बदनाम करून भ्रष्टाचार केला अशा लोकांना खड्यासारखे दूर करून सहकारात चांगल्या लोकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले़ राज्यात तीन लाख २० हजार सहकारी संस्था असून, ज्या स्थापन झाल्या आहेत, त्या उदिष्टेप्रमाणे काम करत नसणाऱ्या ५० हजारांहून अधिक कागदोपत्री असलेल्या कॅरीबॅगमधील संस्था बंद करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले़ खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कागदावरील संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार जे.पी. गावित यांनी वसाका पुनर्जीवित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे यांनी केले. यावेळी परशुराम पगार, के. के. शिंदे, किशोर पगार हिरामण पगार, नंदकुमार खैरनार, मोहनलाल संचेती, नितीन वालखडे, प्रवीण संचेती व पतसंस्थेचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते. (वार्ताहर)