शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: September 20, 2015 22:40 IST

कळवण : सदगुरू गजानन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांची माहिती

कळवण : $ग्रामीण व शहरी भागात पतसंस्था उघडल्यानंतर त्या शासनाचा अंगीकृत एक भाग आहे असे समजून नागरिक आपल्या ठेवी ठेवतात, अडचणीत आलेल्या संस्थांमुळे ठेवीदार अडचणीत येतात त्यामुळे आता नागरिकांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार येत्या दोन महिन्यात पतसंस्थांसाठी नवीन धोरण आखत असून, कॅरीबॅगमधील ५० हजारांहून अधिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.कळवण येथील श्री सदगुरु गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद््घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री सदगुरू गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन महंत रामलखनदास महाराज यांच्या हस्ते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, कळवणचे माजी सरपंच अ‍ॅड. परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, यादवराव पवार व अशोक पवार आदि प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, संचालक प्रकाश अहिरराव, प्रवीण कोठावदे, कैलास खैरनार, अरविंद कोठावदे, प्रशांत पगार आदिंसह संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दादा भुसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पतसंस्थांकडे बघायचा हेतू बदलत चाललेला असताना कळवणसारख्या तालुक्यात पतसंस्था वाढीस लागत असून, कळवणमध्ये पतसंस्था व बँका यांचे कामकाज खरोखरच कौतुकास्पद आहे़ मूठभर लोकांनी सहकार बदनाम करून भ्रष्टाचार केला अशा लोकांना खड्यासारखे दूर करून सहकारात चांगल्या लोकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले़ राज्यात तीन लाख २० हजार सहकारी संस्था असून, ज्या स्थापन झाल्या आहेत, त्या उदिष्टेप्रमाणे काम करत नसणाऱ्या ५० हजारांहून अधिक कागदोपत्री असलेल्या कॅरीबॅगमधील संस्था बंद करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले़ खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कागदावरील संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार जे.पी. गावित यांनी वसाका पुनर्जीवित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे यांनी केले. यावेळी परशुराम पगार, के. के. शिंदे, किशोर पगार हिरामण पगार, नंदकुमार खैरनार, मोहनलाल संचेती, नितीन वालखडे, प्रवीण संचेती व पतसंस्थेचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते. (वार्ताहर)