शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने पाच गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:24 IST

वेळुंजे (त्र्यंबक) : भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, महादेवनगर येथील गावाच्या समस्या ...

ठळक मुद्दे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

वेळुंजे (त्र्यंबक) : भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, महादेवनगर येथील गावाच्या समस्या काही सुटता सुटेना, गावातील पायभूत सुविधांना चालना मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत गावाचा विकास न होण्याला लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचे ग्रामस्थ म्हणतात केवळ मतदानासाठी आमचा उपयोग करत असल्याचे सांगितले. शासनाला व लोकप्रतिनिधीना धडा शिकवण्यासाठी ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.गावातील पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत समस्या सुटत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावे आणि वाड्या, वस्त्या मिळून एकूण ८ हजार मतदार सरकारचा निषेध करत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार नाहीत.सुमारे ८ हजार ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला असून तसे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.चौकटकाय आहेत मागण्यागावांना कश्यपी धरणातून पाणी उपलब्ध करु न द्यावे. वाघेरा धरणातून सोमनाथनगरला पाणी देणे.शेतात जाण्यासाठी शिवरस्ते तयार करावे. नाशिक ते वेळे बस सेवा सुरू करणे. पाचवी ते बारावी वर्ग सुरू करणे. आरोग्य उपकेंद्रात २४ तास डॉक्टर उपलब्ध करावे आणि रु ग्णवाहिका असावी. पशु वैद्यकीय दवाखाना सुरू करणे. गावातील रस्त्याची दुरु स्ती करणे. राष्ट्रीयकृत बँक वेळे गावात उपलब्ध करून देणे. वेळे येथे तलाठी कार्यालय उपलब्ध करून देणे.प्रतिक्रीया-आमचे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने विकासापासून वंचित राहिले आहे. लोकप्रतिनिधीनी आमचा फक्त वापर करून घेतला आहे. अनेक निवेदने दिली, माघील काळात आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे आमच्या गावांना पाणी टँकरने पाणी मिळाले. आता या गेंड्याच्या कातडी असलेल्या या शासनाला आमच्या व्यथा कळणार नाही.- मोहन बेंडकोळीग्रामस्थफोटो ,पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष (25टिबीके वेलुंजे) (25टिबीके वेलुंजे०१)