शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर परीक्षांना सरासरी ५० टक्के गुणांचा निर्णय

By admin | Updated: May 22, 2014 00:04 IST

आरोग्य विद्यापीठ : विद्वत परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; सर्वच पॅथींना होणार लाभ

आरोग्य विद्यापीठ : विद्वत परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; सर्वच पॅथींना होणार लाभनाशिक : एमडी, एमएस आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर ॲग्रीगेट पासिंगचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यानिर्णयाचा लाभ सर्वच पॅथींच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. उत्तीर्णतेसाठी आता सरासरी ५० टक्के गुण तर पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण आवश्यक करण्यात आले आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत पदव्युत्तर विषयवर सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व पदव्युत्तर विद्याशाखेतील विद्यार्थ्यांर्ना लाभ होणार आहे. यापुढे पदव्युत्तर विद्याशाखेतील परीक्षा उतीर्ण होण्यासाठी एकुण गुणांपैकी सरासरी किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक असेल परंतु सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक करण्यात आले आहे. विद्यापीठाने एमडी,एमएस आयुर्वेदचा निकाल जाहिर करतांना भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे निकष डावलून निकाल जाहिर केला होता. त्यामुळे असंख्य विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. परिषदेच्या निकषानुसार च निकाल जाहिर करावा अशी मागणी करीत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. या मागणीचा रेटा वाढल्याने आणि केंद्रीय परिषदेने देखील विद्यापीठाला ॲग्रीगेट पासिंगचे निकष मान्य करण्याचे पत्र दिल्यानंतर विद्यापीठाने हा विषय विद्वत परिषदेसमोर ठेवला होता. त्यामुळे परिषदेच्या निणॅयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रारंभीपासून केंद्रीय परिषदांचा निकष डावलणार्‍या कुलगुरूंनी जेंव्हा हा विषय चर्चेला घेतला तेंव्हा त्यांना परिषदेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. डेंटल आणि मेडीकल साठी ॲग्रीगेट पासींगचा निर्णय मान्य करण्यात आला आला असतांना आयुर्ेवेदासाठ अशी आठमुठे भूमिका का घेतली जात आहे असा प्रश्न परिषदेचे सदस्य डॉ. गजनान एकबोटे यांनी उपस्थित केली. त्यांना इतर सदस्यांनी देखील समर्थन दिले. सुमारे तासभर या विषयावर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय परिषदेच्या निकषाचा मान राखण्याचा मुद्या काही सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेत पदव्युत्तर परिक्षांसाठी सरासरी ५० टक्के गुण आणि पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण आवश्यक करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी जामकर यांनी सांगितले की, वैद्यकीय पदव्युत्तर विद्याशाखेसाठी पूर्वीपासूनच हा निर्णय लागू आहे. तथापी आयुर्वेद पदव्युत्तर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी २०१३ परीक्षेसाठी लागू राहिल. व उन्हाळी सत्र २१०४ च्या परीक्षेपासून सर्व पदव्युत्तर विद्याशाखांसाठी सदर निर्णय लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. --इन्फो---विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाला जाग पदव्युत्तर अभ्यासक्रमासांठी केंद्रीय परिषदेच्या निकषानुसार गुण दयावेत या मागणीसाठी विद्यापीठाकडे मागणी करण्यात आली होती. परंतु विद्यापीठाने यासंदर्भात राजपत्र तसेच केंद्रीय परिषदेचे निकषही संदिग्ध असल्याची भूमिका घेत हा विषय त्यांनी विद्वत परिषदेवर ठेवला होता. विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्वत परिषदेच्या सदस्यांनी देखील कुलगुरूंच्या भूुमिकेवर टिका केल्यानंतर तसेच ॲग्रीगेट पासींग देण्याचा आग्रह धरल्यानंतर ॲग्रीगेटचा निर्णय घेतला गेला. या समस्त एमडी,एमएस आयुर्वेद विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे. - डॉ. आशुतोष गुप्ता, एमडी.एमएस,विद्यार्थी संघटना.