शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

नाशिक : कोणताही सामना किंवा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघाने मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची झालेली ...

नाशिक : कोणताही सामना किंवा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघाने मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची झालेली असते. केवळ सकारात्मक पद्धतीने मनाला कसे उत्तेजित करायचे, संघ भावना व क्रीडा भावना कशा पद्धतीने आपल्या देहबोलीतून व नजरेतून व्यक्त करायच्या ते समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी राज्य खो-खो स्पर्धेतील उपविजेत्या नाशिकच्या खो-खोपटू कन्यांशी संवाद साधला.

मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच नाशिकमध्येसुध्दा या विषयावर विविध क्रीडा मार्गदर्शकांसाठी व राष्ट्रीय खेळाडूंसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्राचे महत्त्व ओळखून हा प्राधान्याचा विषय करण्याचे औचित्य पाश्चिमात्य देशांनी दाखवून त्यानुसार पावले उचलली. त्यामुळेच तेथील देश आणि खेळाडूंनी ऑलिम्पिकच्या इतिहासात उत्तुंग भरारी घेतली. आपल्या देशात नेहमीप्रमाणे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे कोणालाही वाटले नाही. खेळाडूंना त्यांच्या अन्य मार्गदर्शनाबरोबरच मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते, हे स्व. भीष्मराज बाम यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. पिढ्यान् पिढ्या ज्यांचा आवाज समाजव्यवस्था व सामाजिक परिस्थितीमुळे कधीही तुम्हा-आम्हाला ऐकू आला नाही. त्या समाजाचे ते प्रतिनिधीत्व करतात. पण अबोल असलेल्या या मुली मैदानात मात्र आपल्या खेळातूनच बोलून दाखवतात आणि तीच तुमची भाषा असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर व पराभूत झाल्यानंतरही तो कसा स्वीकारायचा, याच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स त्यांनी खेळाडूंना दिल्या. या सत्रासाठी दीपा खेडकर यांनी विशेष सहकार्य केले. खेळ हा गांभीर्याने घेण्याची गरज असून, त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांचे स्वागत संघटक मंदार देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक उमेश आटवणे यांनी केले. गीतांजली सावळे यांनी आभार मानले.

फोटो

११ खो-खो