शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:31 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकºयांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे, मात्र फसलेली ही कर्जमाफी ही शेतकºयांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकºयांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे, मात्र फसलेली ही कर्जमाफी ही शेतकºयांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाही. या फसलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता राज्यातील शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणी विखे यांनी यावेळी केली.  नाशिकला शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ना. विखे बोलत होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली खरी; मात्र योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी नसल्याचे स्पष्ट होत आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची आकेडवारी सांगता सांगता सरकारची बौद्धिक  दिवाळखोरी जनतेसमोर येत आहे. दिवाळी गोड करण्याच्या नादात प्रमाणपत्र देण्याचा फार्स करण्यात  आला.  मात्र, प्रमाणपत्र पुन्हा घेण्याची नामुष्की या सरकारवर ओढविली आहे. त्यामुळे या सरकारने कर्जमाफीचा फुटबॉल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगतात. प्रत्यक्षात मात्र एक दमडीही खात्यात जमा झालेली नाही. यावर सहकार विभाग, तंत्रज्ञान विभागाच्या चुका असल्याचा कांगावा सरकार करत आहे. यातून सरकार स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे राधाकृष्ण विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकार कुपोषण, अंगणवाडी कर्मचारी प्रश्न तसेच आदिवासी विभागातील योजनांवर सपशेल अपयशी ठरले असून, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची मालिकाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस विनायक देशमुख, आमदार डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे उपस्थित होते.