शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:52 IST

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.

ठळक मुद्देदुर्घटना : पाचपैकी चार मुलींना वाचविण्यात यश

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत चार मुलींना वाचवले.आसरबारी येथील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (१४) ज्योती तुकाराम जाधव (१२), अर्चना तुकाराम जाधव (१६) व दीक्षा तुकाराम जाधव (११) या पाच मुली हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर पोहण्याची इच्छा झाल्याने पाचही मुलींनी धरणात उड्या घेतल्या. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने साक्षी भुसारे व ज्योती जाधव बुडू लागल्या. मुलींचा ओरडाओरडा ऐकून परिसरातच असलेल्या तीन मुलांनी घटनास्थळी धाव घेत जिवाची पर्वा न करता या मुलींना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साक्षीला वाचविण्यात या छोट्या मुलांना यश आले. मात्र ज्योती तुकाराम जाधव पाण्याखाली गेल्याने वाचवणे कठीण झाले. सदरची घटना कळताच हरणगाव, आसरबारीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रयत्न करून रात्री ८ च्या सुमारास ज्योतीचा मृतदेह हाती लागला. याबाबत पोलीसपाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पोलिसांना खबर दिली.पोलीस पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना पाचारण केले. मयत ज्योती जाधव या मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत पेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.तिघांनी केले शर्थीचे प्रयत्नधरणात मुली बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरात असलेले देवानंद मुरलीधर गायकवाड, हर्षद रघुनाथ जाधव व पंडित रोहिदास गायकवाड या १०-१२ वर्षीय मुलांनी धरणाकडे धाव घेऊन जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. एका मुलीला वाचवत पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले; मात्र ज्योती जाधव हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही लहान मुले वेळेत हजर झाली नसती तर मोठे संकट ओढवणार होते. सदर घटनने आसरबारी गावावर शोककळा पसरली. साक्षी व जयश्री या दोन्ही दिंडोरी तालुक्यातील सादराळे गावच्या असून, सुटीनिमित्त आसरबारी येथे मामाच्या गावी आल्या होत्या.