घोटी : इगतपुरी तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यात घोटी येथील पाणीपुरवठा यंत्रणाही ठप्प झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर घोटीतील काही सामाजिक युवकांनी आज रामदेवबाबा मंदिरात पर्जन्ययाग यज्ञ केला. अकरा विवाहित जोडप्यांनी या यज्ञसोहळ्यात सहभागी होऊन वरुणदेवतेला साकडे घातले.रामदेवबाबा संस्थानच्या पुढाकाराने घेतलेल्या या यज्ञसोहळ्याचे पौरोहित्य हरिद्वार येथील महंत राजनारायणजी महाराज यांनी वैदिकरीत्या पार पाडले. त्यांना चतुर्भुज महाराज, संजय नारायण महाराज, आकाश महाराज यांनी साहाय्य केले. यज्ञासाठी संस्थानाचे कार्यकर्ते तुषार भन्साळी, हितेश गांधी, भावेश कुमठ, भूषण बोथरा, संतोष शिंगवी, विपूल पिचा, जयेश पिचा, भरत पटेल, गौतम पोखरणा आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)
घोटीत युवकांनी केला पर्जन्ययाग
By admin | Updated: July 11, 2014 00:54 IST