शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग भाजीपाला रस्त्यावर ओतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:01 IST

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.

ठळक मुद्देभाजीबाजार स्थलांतराला विरोध ;कवडीमोल भावाचा निषेधदुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा ;बाजार समिती पदाधिकारी गैरहजर

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.यावेळी संतप्त शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकºयांनी महामार्गावर ठिय्या मांडला.घोटी बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ सकाळी ८ वाजता सर्व शेतकरी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले. मुंबई- आग्रा महामार्गावर या शेतकºयांनी ठिय्या मांडत महामार्ग रोखून धरला.बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेवून शेतकºयांना मूलभूत सुविधा द्याव्यात, शेतमालाला हमीभाव मिळावा, अशा मागण्या करीत शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून दिला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दरम्यान, यावेळी बाजार समितीच्या वतीने संदीप गुळवे, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने सचिव संजय सांगळे, तहसीलदार अनिल पुरे आदींनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आपल्या मागण्यांबाबत लेखी ग्वाही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.अखेर बाजार समितीच्या वतीने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बाजार समितीने स्थलांतरित केलेल्या बाजार जागेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या नवीन जागेत शेतमालही आणला होता. मात्र या ठिकाणी व्यापाºयांनी पाठ फिरविल्याने अनेकांना ग्राहकच मिळेना यामुळे शेतकºयांचा उद्रेक झाला आणि उद्रेकाचे रूपांतर आंदोलनात झाले.घोटी बाजार समिती आवार कमी पडत असल्याने काही शेतमाल घोटीच्या बाहेर विक्री करण्यासाठी शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. यामुळे शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार होता. यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती प्रतिनिधी यांची बैठक बोलविण्यात आली यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.- गोरख बोडके, उपसभापती,घोटी बाजार समितीबाजार समितीने स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, निवाराशेड, शौचालये आदी सुविधा देणे क्र मप्राप्त होते. मात्र अशा कोणत्याही सुविधा बाजार समितीने दिल्या नसल्याने भाजीपाल्याची होणारी हेळसांड आणि शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाचा सकारात्मक निर्णय झाला.- पांडुरंग शिंदे, शेतकरी नेते