शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

घोटीत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग भाजीपाला रस्त्यावर ओतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:01 IST

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.

ठळक मुद्देभाजीबाजार स्थलांतराला विरोध ;कवडीमोल भावाचा निषेधदुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा ;बाजार समिती पदाधिकारी गैरहजर

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने या बाबीला तालुक्यातील शेतकºयांनी कडवा विरोध करीत शनिवारी मुंबई - आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाºया कमी भावाचा निषेध केला.यावेळी संतप्त शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकºयांनी महामार्गावर ठिय्या मांडला.घोटी बाजार समितीने शेतकºयांना आणि व्यापाºयांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ सकाळी ८ वाजता सर्व शेतकरी संघटित होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले. मुंबई- आग्रा महामार्गावर या शेतकºयांनी ठिय्या मांडत महामार्ग रोखून धरला.बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेवून शेतकºयांना मूलभूत सुविधा द्याव्यात, शेतमालाला हमीभाव मिळावा, अशा मागण्या करीत शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल रस्त्यावर ओतून दिला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दरम्यान, यावेळी बाजार समितीच्या वतीने संदीप गुळवे, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने सचिव संजय सांगळे, तहसीलदार अनिल पुरे आदींनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आपल्या मागण्यांबाबत लेखी ग्वाही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.अखेर बाजार समितीच्या वतीने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बाजार समितीने स्थलांतरित केलेल्या बाजार जागेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या नवीन जागेत शेतमालही आणला होता. मात्र या ठिकाणी व्यापाºयांनी पाठ फिरविल्याने अनेकांना ग्राहकच मिळेना यामुळे शेतकºयांचा उद्रेक झाला आणि उद्रेकाचे रूपांतर आंदोलनात झाले.घोटी बाजार समिती आवार कमी पडत असल्याने काही शेतमाल घोटीच्या बाहेर विक्री करण्यासाठी शहराबाहेर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. यामुळे शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार होता. यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या सोमवारी शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती प्रतिनिधी यांची बैठक बोलविण्यात आली यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.- गोरख बोडके, उपसभापती,घोटी बाजार समितीबाजार समितीने स्थलांतरित केलेल्या जागेत कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, निवाराशेड, शौचालये आदी सुविधा देणे क्र मप्राप्त होते. मात्र अशा कोणत्याही सुविधा बाजार समितीने दिल्या नसल्याने भाजीपाल्याची होणारी हेळसांड आणि शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाचा सकारात्मक निर्णय झाला.- पांडुरंग शिंदे, शेतकरी नेते