शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 19:41 IST

पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देगुजरखेडे गावची मदार टँकरच्या पाण्यावरच; खेपा वाढविण्याची मागणी

पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.येथील नागरिकांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तेव्हा कुठे हंडे दोन हंडे पाणी उपलब्ध होत आहे. गावात टँकर आल्यावर पाणी भरण्यासाठी महिला पुरु ष व मुलांची मोठया प्रमाणात झुंबड उडत आहे. त्यातूनच पाणी भरण्यावरून गावात भांडण तंटे होत आहे.गेल्या वर्षभरापासून पावसाळ्यातही या गावाला शासनाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची संपूर्ण मदार ही शासनाने सुरु केलेल्या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गावातील पाण्याचा टँकर हा अनियमित येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करून घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करीत पाणी उपलब्ध करून आपली तहान भागवावी लागत आहे.याबाबत येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली व गावाला नियमित पाणी पुरवावे अशी मागणी केली असता, गावात दोन दिवसांपासून टँकर सुरु करण्यात आला, मात्र सुमारे दीड हजार लोकसंख्येच्या या गावाला दिवसाकाठी एकच पाण्याची खेप केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजच टँकरची वाट पहावी लागत आहे.प्रत्येक दिवशी एका वस्तीवर एक खेप टाकली जात असल्याने दुसऱ्या वस्तीवर अथवा गावात पाच ते सहा दिवसांनी दुसरी खेप मिळत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. याच पाण्याचा पाच ते सहा दिवस जपून वापर करावा लागत आहे. या गावासाठी शासनाने टँकरच्या खेपा वाढवून द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून या गावाला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी दरवर्षी लाखो रु पयांचा खर्च येत आहे. मात्र पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या गावासाठी कोणतीही योजना राबविली जात नसल्याने ग्रामस्थांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने या गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी तसेच गावात पिण्याच्या पाण्याच्या खेपा वाढविण्यात याव्यात अशी मागणी नारायण चव्हाण, अनिल चव्हाण, बाळू आढांगळे, विष्णू चव्हाण, पुंजाराम गुजर, पोपट चव्हाण, पांडुरंग चव्हाण, बाळू चव्हाण, अशोक चव्हाण, रामदास पवार, रमेश चव्हाण, रावसाहेब पारखे, चंद्रभान चव्हाण, मधुकर पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती मार्फत सध्या एका टँकरने गावला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी पुरवठा अनियमित केला जात असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावासाठी टँकरच्या किमान दोन खेपा पुरविण्यात याव्या त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.- धर्मा पारखे, गुजरखेडे.या गावाला गेल्या काही वर्षांपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. गावासाठी कायमस्वरूपी योजना राबवावी व पाणी प्रश्न कायमचा सोडवावा. ग्रामस्थांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासनाने या गावात टँकरच्या फेऱ्या वाढवून देण्यात याव्या.- कर्णा चव्हाण, गुजरखेडे.