शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 19:41 IST

पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देगुजरखेडे गावची मदार टँकरच्या पाण्यावरच; खेपा वाढविण्याची मागणी

पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.येथील नागरिकांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तेव्हा कुठे हंडे दोन हंडे पाणी उपलब्ध होत आहे. गावात टँकर आल्यावर पाणी भरण्यासाठी महिला पुरु ष व मुलांची मोठया प्रमाणात झुंबड उडत आहे. त्यातूनच पाणी भरण्यावरून गावात भांडण तंटे होत आहे.गेल्या वर्षभरापासून पावसाळ्यातही या गावाला शासनाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची संपूर्ण मदार ही शासनाने सुरु केलेल्या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गावातील पाण्याचा टँकर हा अनियमित येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करून घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करीत पाणी उपलब्ध करून आपली तहान भागवावी लागत आहे.याबाबत येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली व गावाला नियमित पाणी पुरवावे अशी मागणी केली असता, गावात दोन दिवसांपासून टँकर सुरु करण्यात आला, मात्र सुमारे दीड हजार लोकसंख्येच्या या गावाला दिवसाकाठी एकच पाण्याची खेप केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजच टँकरची वाट पहावी लागत आहे.प्रत्येक दिवशी एका वस्तीवर एक खेप टाकली जात असल्याने दुसऱ्या वस्तीवर अथवा गावात पाच ते सहा दिवसांनी दुसरी खेप मिळत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. याच पाण्याचा पाच ते सहा दिवस जपून वापर करावा लागत आहे. या गावासाठी शासनाने टँकरच्या खेपा वाढवून द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून या गावाला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी दरवर्षी लाखो रु पयांचा खर्च येत आहे. मात्र पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या गावासाठी कोणतीही योजना राबविली जात नसल्याने ग्रामस्थांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने या गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी तसेच गावात पिण्याच्या पाण्याच्या खेपा वाढविण्यात याव्यात अशी मागणी नारायण चव्हाण, अनिल चव्हाण, बाळू आढांगळे, विष्णू चव्हाण, पुंजाराम गुजर, पोपट चव्हाण, पांडुरंग चव्हाण, बाळू चव्हाण, अशोक चव्हाण, रामदास पवार, रमेश चव्हाण, रावसाहेब पारखे, चंद्रभान चव्हाण, मधुकर पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती मार्फत सध्या एका टँकरने गावला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी पुरवठा अनियमित केला जात असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावासाठी टँकरच्या किमान दोन खेपा पुरविण्यात याव्या त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.- धर्मा पारखे, गुजरखेडे.या गावाला गेल्या काही वर्षांपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. गावासाठी कायमस्वरूपी योजना राबवावी व पाणी प्रश्न कायमचा सोडवावा. ग्रामस्थांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासनाने या गावात टँकरच्या फेऱ्या वाढवून देण्यात याव्या.- कर्णा चव्हाण, गुजरखेडे.