शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
6
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
7
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
8
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
9
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
10
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
11
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
12
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
13
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
14
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
15
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
16
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
17
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
18
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

सुस्तमनपाला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:16 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट संतप्त : फलकबाजांवर कारवाईचे आदेश; प्रशासन मात्र अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे.नाशिकसह राज्यात वाढती फलकबाजी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. विशेषत: राजकीय मंडळांचे शुभेच्छा, अभीष्टचिंंतन आणि अगदी दशक्रिया विधीचे लागणारे फलक हे कोणत्याही शास्त्रीय निकषासह असतात. त्यातून अपघात तर घडतातच परंतु फलकबाजीतून भावना दुखावण्यापासून खून करण्यापर्यंतचे प्रकार नाशिक शहरात घडले आहेत. परंतु त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. गेल्यावर्षी फलकबाजीतून होणारे विद्रुपीकरणी रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती अभय ओक व पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक शहरात फलक हटविले गेले. परंतु त्यानंतर पुन्हा फलकबाजांचे पेव फुटले. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आली असली तरी अन्य सर्व ठिकाणचा विचार करता राज्य शासनाने जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ती मुदत संपत आल्याने गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत २३ फेबु्रवारी ही अंतिम मुदत दिली आहे. यानंतर फलक दिसल्यास त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे समजून कारवाई करण्यात येईल. अधिकाºयांची नाही मानसिकताहोर्डिंग हटविल्याची कारवाई केल्यानेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आरोप करण्यात आले आणि त्या आधारे चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या सदस्याने उपआयुक्तांवर आरोप केले, त्यालाच चौकशी समिती सदस्य म्हणून घेण्याचा अजब प्रकारही स्थायी समितीने केला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा प्रभाव असलेले फलक काढण्याबाबत विभागीय अधिकारी आणि कर्मचारी कच खात असल्याचे सांगण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आली असली तरी अन्य सर्व ठिकाणचा विचार करता राज्य शासनाने जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत २३ फेबु्रवारी ही अंतिम मुदत दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे समजून कारवाई करण्यात येणार आहे.