शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सुस्तमनपाला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:16 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट संतप्त : फलकबाजांवर कारवाईचे आदेश; प्रशासन मात्र अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फलक हटविण्याची कारवाई करणारी महापालिका नंतर मात्र थंड झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना फेब्रुवारीपर्यंत फलक हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा कडक इशारा दिला आहे.नाशिकसह राज्यात वाढती फलकबाजी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. विशेषत: राजकीय मंडळांचे शुभेच्छा, अभीष्टचिंंतन आणि अगदी दशक्रिया विधीचे लागणारे फलक हे कोणत्याही शास्त्रीय निकषासह असतात. त्यातून अपघात तर घडतातच परंतु फलकबाजीतून भावना दुखावण्यापासून खून करण्यापर्यंतचे प्रकार नाशिक शहरात घडले आहेत. परंतु त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. गेल्यावर्षी फलकबाजीतून होणारे विद्रुपीकरणी रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती अभय ओक व पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक शहरात फलक हटविले गेले. परंतु त्यानंतर पुन्हा फलकबाजांचे पेव फुटले. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आली असली तरी अन्य सर्व ठिकाणचा विचार करता राज्य शासनाने जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ती मुदत संपत आल्याने गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत २३ फेबु्रवारी ही अंतिम मुदत दिली आहे. यानंतर फलक दिसल्यास त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे समजून कारवाई करण्यात येईल. अधिकाºयांची नाही मानसिकताहोर्डिंग हटविल्याची कारवाई केल्यानेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आरोप करण्यात आले आणि त्या आधारे चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या सदस्याने उपआयुक्तांवर आरोप केले, त्यालाच चौकशी समिती सदस्य म्हणून घेण्याचा अजब प्रकारही स्थायी समितीने केला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा प्रभाव असलेले फलक काढण्याबाबत विभागीय अधिकारी आणि कर्मचारी कच खात असल्याचे सांगण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात आली असली तरी अन्य सर्व ठिकाणचा विचार करता राज्य शासनाने जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत २३ फेबु्रवारी ही अंतिम मुदत दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे समजून कारवाई करण्यात येणार आहे.