शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी बांधव रांचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:03 IST

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देमराठी भाषेतील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते.हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान, जल जंगल जमीन हमारा है, हमें चाहिए आजादी, मनु वादसे, भष्टाचार से, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रांची शहरात गुरूवारी झालेल्या या मेळाव्यात अनुसुचित क्षेत्रात ५ वी आणि ६ वी अनुसुची लागू करणे, आदिवासी संस्कृतीवर विविध धर्माचे धार्मिक आक्र मण रोखणे, युनोने दिलेले मुलभूत अधिकारात ४६ कलमी घोषणा पत्रातील अधिकार लागू करणे, देशातील आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार व शोषणाविरूद्ध आंदोलन उभे करणे, शिक्षण आरोग्य कुपोषण अ‍ॅट्रोसिटी कायदा आरक्षण, वन अधिकार कायद्यावर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्र मासाठी, महाराष्टÑ, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम, ओरिसा, राज्यस्थान, दादरा नगर हवेली, प. बंगाल, दिल्ली, उत्तरांचल, तेलंगणा या १३ राज्यांसह नेपाळ येथील ५० हजार आदिवासी बांधव उपस्थित होते. रांचीतील या मेळाव्यात आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री अमरसिंग चौधरी, पोरलाल खरते, अशोक बागुल, प्रभु टोकीया, माजी सनदी अधिकारी टी. के. बागुल, प्रभाकर पवार, यशवंत पवार, राम चौरे, सी. एल. पवार, किसन ठाकरे, जयवंत गारे, बी. बी. बहिरम, के. के.गांगुर्डे, डॉ. जगदीश चौरे, चिंतामण गायकवाड, एन.एस. चौधरी, रतन चौधरी, पांडुरंग पवार, देविदास देशमुख, श्रीकांत पवार, विनायक भोये, हरिराम गावित, तुकाराम भोये, हिरामण चौधरी, लक्ष्मण भोये, नामदेव जोपळे, तुकाराम जाधव, राजू चौधरी, चंदर चौधरी, यांच्यासह नाशिक जिल्ह्यÞातील पेठ, सुरगाणा, कळवण सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक राज्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे प्रतिनिधीत्व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शिक्षक संघटनेने केले.यावेळी बिरसा मुंडा यांच्या स्मारकास उपस्थितांनी भेट दिली.