शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:03 IST

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवस - रात्र एक करुन येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देमालेगावी शांतता समितीच्या बैठकीत मनपा आयुक्तांचे आश्वासन

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवस - रात्र एक करुन येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.याच बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवा, मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करा. विसर्जनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करा. येत्या दोन दिवसात दृश्य स्वरूपात काम दिसले पाहिजे, असे खडे बोल सुनावले. पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात मंगळवारी शांतता समितीची बैठक झाली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, आयुक्त गोसावी, उपअधीक्षक लता दोंधे, प्रदीप जाधव, मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष केवळ हिरे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, अग्निशमन दल प्रमुख संजय पवार, पाणीपुरवठा विभागाचे जयपाल त्रिभुवन आदि उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख रामा मिस्तरी यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, पथदिप आदि माफक अपेक्षा नागरिकांच्या आहेत. डी. के. कॉर्नर ते टेहरे चौफुली पर्यंतचा रस्ता पोलीस अधीक्षक निवास ते श्रीराम नगर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.

कैलास तिसगे यांनी कुठल्याही सणाच्या आधी एक महिना आधी शांतता समितीची बैठक घ्यावी. या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी करावी. मनपा सण, उत्सव असतील तेव्हाच काम करेल का? असा सवाल उपस्थित केला.अपर जिल्हाधिकारी निकम यांनी महापालिकेने विसर्जनासाठी तात्पुरते १३ गणेश कुंड उभारावेत, अशी सूचना केली. विसर्जनापूर्वी शहर खड्डे मुक्त करावे, असेही सांगितले. अपर पोलीस अधीक्षक खांडवी म्हणाले की, गुन्हेगार व समाजकंटक म्हणून नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. त्याचे कोणी वाईट वाटून घेवू नये. प्रशासकीय बाब म्हणून नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०७ एमएसईपी ०४ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे आदि.

टॅग्स :MalegaonमालेगांवMuncipal Corporationनगर पालिका