शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

दुपारनंतर उघडीप; पूर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:18 IST

शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (दि.२९) जोर धरला होता; मात्र दुपारी १२ वाजेपासून पावसाने उघडीप दिली.

नाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (दि.२९) जोर धरला होता; मात्र दुपारी १२ वाजेपासून पावसाने उघडीप दिली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्गही कमी करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला. रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू होता. सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गोदावरीच्या पुराची तीव्रता वाढते की काय, अशी भीती नाशिककरांसह प्रशासनालाही वाटत होती; मात्र दहा वाजेपासून पावसाचा जोर कमी झाला आणि बारावाजेपर्यंत पावसाने उघडीप दिली. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे गंगापूर धरणातूनही विसर्ग सकाळपासून ‘जैसे-थे’ ठेवण्यात आला होता. गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने शांतपणे वाहणाºया गोदामाईसोबत ‘सेल्फी’ घेण्यासाठी संध्याकाळी तरुणाईची गोदाकाठावर गर्दी झाली होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची वर्दळ वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाजारपेठांमध्येही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक मानल्या जाणाºया गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होती. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने दिवसभरात शहरात ९ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद केली आहे.