शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

विद्युत वाहिनीच्या सोयीच्या ठेकेदारासाठी तारीख पे तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:15 IST

नाशिक अमरधाममध्ये यापूर्वी डिझेल शवदाहिनी होती ती वर्षभरापूर्वी गॅसवर करण्यात आली. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी विद्युत शवदाहिनी आणि त्या ...

नाशिक अमरधाममध्ये यापूर्वी डिझेल शवदाहिनी होती ती वर्षभरापूर्वी गॅसवर करण्यात आली. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी विद्युत शवदाहिनी आणि त्या पाठोपाठ आणखी एक दाहिनी गेल्यावर्षी बसवण्यात आली. कोरोना काळात संसर्ग टाळण्याठी मृतदेहांवर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यानुसार महापालिकेने या तीन शवदाहिन्यांचा उपयाेग केला आहे.

नाशिक अमरधामवर येणारा ताण लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने शासकीय अनुदानातून पंचवटी, दसक आणि उंटवाडी स्मशानभूमीत देखील विद्युत दाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विद्युत दाहिनीसाठी ३ कोटी ७५ लाख २६ हजार ३७१ रूपये अशी रक्कम ठरवून १८ फेब्रुवारी रोजी प्रथम निविदा मागवण्यात आल्या हात्या. त्यानंतर २ मार्च राेजी मुदतवाढ देण्यात आली आणि १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा निविदेत काही बदल करून २३ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपत नाही तर पुन्हा अटी शर्तीत बदल करून पुन्हा ५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. मुळातच महापालिकेने एका निविदा मागवल्यानंतर त्यात आलेल्या निविदेत किंवा प्री बिड मिटींगमध्ये काही अव्यवहार्य किंवा स्पर्धात्मक वाढीसाठी बदल केले जातात. मात्र येथे निविदा येत नाही तोच अनेक बदल केले जात आहेत. विशिष्ट ठेकेदाराच्या सोयीसाठी सारे काही जमून येत नाही त्यासाठी हा जुगाड घातला जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे शहरातील नाशिक अमरधाममधील विद्युत दाहिन्यांवर ताण येत असल्याने पंचवटीसह अन्यत्र विद्युत दाहिन्या त्वरित कार्यवाही होणे अपेक्षित असताना दुसरीकडे मात्र अर्थकारण आणि टक्केवारीसाठी आटापिटा सुरू असल्याचे दिसत आहे.

इन्फेा...

महापालिकेचा विद्युत विभाग अशा सोयीच्या ठेकेदारांना पाेसण्यासाठी कुप्रसिध्द होत चालला आहे. यापूर्वी देखील शहरातील जुने पोल बदलण्याच्या निविदेसाठी अशाच प्रकारे तारीख पे तारीख सुरू होते. तेा पर्यंत संबंधित सोयीच्या ठेकेदार त्या अटी शर्तीत बसत नाही तो पर्यंत बदल होत राहतात. त्यामुळे आता घोळांबाबत विद्युत विभाग रडारवर आला आहे.

इन्फाे...

आयुक्त लक्ष घालतील का?

सध्या शहरात कोरोना संसर्ग प्रचंड वाढत असल्याने आयुक्त आणि अन्य प्रशासनाला त्याकडे लक्ष पुरवावे लागत अहो. मात्र दुसरीकडे विद्युत विभाग आणि त्यांच्याशी संबंधित संधिसाधू अशा परिस्थितीत हात धुवून घेत आहेत, अशा तक्रारी आहेत. आयुक्त कैलास जाधव किमान विद्युत दाहिनीच्या प्रकरणात तर लक्ष घालतील काय?