शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हनुमानवाडीतील उद्यानात अंधार

By admin | Updated: July 7, 2014 00:41 IST

हनुमानवाडीतील उद्यानात अंधार

 

हनुमानवाडी : पंचवटीतील हनुमानवाडी येथील उद्यानातील पथदीप गेल्या पंधरवड्यापासून बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील हनुमानवाडीत एकमेव असलेले उद्यान आजघडीला अखेरच्या घटका मोजत आहे. उद्यान तयार होऊन अनेक वर्षे झाली, मात्र उद्यानात अद्यापही खेळणी बसविण्यात आलेल्या नाहीत. पूर्वीच्या ज्या एक-दोन खेळणी होत्या; त्यांचीही पूर्ण वाट लागली आहे. त्यामुळे बालगोपाळांना खेळण्यासाठी खेळणीच उरल्या नसल्याने बालकांचा हिरमोड होत आहे. तसेच पाण्याअभावी उद्यानातील झाडेदेखील सुकली आहेत. चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या हनुमानवाडीकरांसाठी असलेल्या एकट्या उद्यानाचीही दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून पथदीप बंद असल्याने उद्यानात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे सायंकाळी व रात्री जेवण झाल्यानंतर उद्यानात शतपावलीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारामुळे येथे मद्यपींचाही वावर वाढला असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने उद्यानात तातडीने खेळणी बसवाव्यात व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)