शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

येवला हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अंधार

By admin | Updated: September 12, 2016 00:27 IST

येवला हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अंधार

येवला : येवला शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्ग क्र मांक १० च्या शहर हद्दीत दुभाजकांवर टोल कंपनीने लावलेले हायमास्ट (दिवे) केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून, हे दिवे सहा महिन्यांपासून बंद असल्याने दिव्याखाली अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील हे अंधाराचे जाळे कधी फिटणार, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. संवेदना बोथट झाल्याने सोशिक येवलेकरदेखील सवय झाल्याप्रमाणे ब्र बोलायला तयार नाहीत. बीओटी आणि नगरपालिका यांच्यातील तू तू मै मै मुळे येवला नगरपालिका हद्दीतून असणारे हे पथदीप अखेरची घटका मोजत आहेत.शहर व शहरवासीयांची काळजी करणारा कोणी शिल्लक राहिला आहे की नाही, अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे-येणारे करीत आहेत. शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड महामार्गावरून जाताना मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर असल्याचा भास होतो. अशा प्रकारची प्रशंसा येवला भेटीत दिग्गज पार्श्वगायक सुरेश वाडकर, सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह एकसे बढकर एक सेलिब्रिटी करून गेलेत. हल्ली मात्र या रस्त्यावर अंधाराचे जाळे पसरले असून, दुभाजकांची अवस्थादेखील खराब झाली आहे. विंचुर चौफुली व फत्तेबुरूज नाक्यावरील चौफुलीच्या मध्यभागी हायमास्क लावून त्यावर सर्व बाजूंना प्रकाश पडावा म्हणून पाच-सहा दिवे दिवसा दिसतात मात्र ते रात्री बंद असतात. मनमाड-नगर हा महामार्ग प्रचंड वाहतुकीचा असून, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने सर्व दिवे लागणे आवश्यक आहे. या सर्व पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी येवले शहराजवळ असलेल्या टोलनाक्यावरील ठेकेदाराची की येवला पालिकेची, हा प्रश्न अद्यापही सुटला नाही. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तक्रारी केल्या पण त्याचा काही परिणाम झालाच नाही. आमदार छगन भुजबळ मतदारसंघात नित्यनियमाने यायचे तोपर्यंत परिस्थिती चागली होती. आता मात्र सध्या दिव्याचे आत्मवृत्त लिहिण्याची वेळ आली आहे. बीओटी तत्त्वावर झालेला हा रस्ता व त्या रस्त्यावर दिवे लावण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्च बीओटी प्रशासनाने करायचा आहे. परंतु देखभालीसह वीजबिलाचा खर्च पालिकेने सोसून ही यंत्रणा पालिकेने ताब्यात घ्यावी, अशा आशयाचे पत्र बीओटी प्रशासनाने पालिकेला दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरडाओरड करीत आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करणारे नगरसेवक याबाबत ठोस भूमिका का घेत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)