शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

 

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून भारनियमनाच्या नावाखाली अतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र त्यांना आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. वीज मंडळाच्या अतिरिक्त भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने विजेच्या खांबासह तुटलेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांची दुरुस्ती करण्यात आली; मात्र भारनियमनात काहीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील विहिरींना पाणी नसल्याने कृषिपंपाचा वीज वापर होत नसतानाही कमी वीज मागणीच्या काळातही अतिरिक्त भारनियमन सुरु केले आहे. वीज कंपनीने ठरवून दिलेल्या भारनियमनाच्या व्यतिरिक्तही वीजपुरवठा सतत खंडित केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त थ्रीफेज वीजपुरवठा कधी दोन तास, तर कधी तासभर खंडित केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. खंडित होणाऱ्या थ्रीफेज वीजपुरवठ्याचा इतर गावांना फारसा फटका बसत नसला तरी गोदावरी नदीकाठच्या गावांना पिकांना पाणी देता येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या भागात थोड्या फार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. त्या गावातील शेतकरी जनावरांना पिण्याचे पाणी काढण्यासाठीच वीजपंप सुरू करतात मात्र विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी काढण्यासाठी हाल होत आहे. (वार्ताहर)