शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य

 

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून भारनियमनाच्या नावाखाली अतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र त्यांना आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. वीज मंडळाच्या अतिरिक्त भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने विजेच्या खांबासह तुटलेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांची दुरुस्ती करण्यात आली; मात्र भारनियमनात काहीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील विहिरींना पाणी नसल्याने कृषिपंपाचा वीज वापर होत नसतानाही कमी वीज मागणीच्या काळातही अतिरिक्त भारनियमन सुरु केले आहे. वीज कंपनीने ठरवून दिलेल्या भारनियमनाच्या व्यतिरिक्तही वीजपुरवठा सतत खंडित केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त थ्रीफेज वीजपुरवठा कधी दोन तास, तर कधी तासभर खंडित केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. खंडित होणाऱ्या थ्रीफेज वीजपुरवठ्याचा इतर गावांना फारसा फटका बसत नसला तरी गोदावरी नदीकाठच्या गावांना पिकांना पाणी देता येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या भागात थोड्या फार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. त्या गावातील शेतकरी जनावरांना पिण्याचे पाणी काढण्यासाठीच वीजपंप सुरू करतात मात्र विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी काढण्यासाठी हाल होत आहे. (वार्ताहर)