शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचा ताप वाढणार

By admin | Updated: July 22, 2016 00:06 IST

साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचा ताप वाढणार

 नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने ३४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. दरम्यान, शहरातील डॉक्टर्स, पॅथॅलॉजिस्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेने शुक्रवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथे बोलाविली असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.शहरात गेल्या आठवड्यापासून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असून, सिडको, सातपूर आणि जेलरोड परिसरात त्याचा प्रभाव सर्वाधिक आहे. आतापर्यंत १७४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने रोज किमान ५० ते १०० घरांना भेटी देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांकडून माहिती संकलित करायची असून, त्यांचे प्रबोधनही करायचे आहे. झोपडपट्टी आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व्हे केला जात आहे. डेंग्यूचे निदान आणि त्यासंबंधीच्या तपासणीसंबंधीची माहिती देण्यासाठी शहरातील डॉक्टर्स, पॅथॅलॉजिस्ट यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली असून, रुग्ण दाखल होताच रिर्पाेटिंग करण्याचेही आदेश यावेळी संबंधितांना दिले जाणार आहेत. याशिवाय मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंटेनर तपासणी मोहीम हाती घेऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील खासगी डॉक्टरांकडून रुग्णांचे पूर्ण निदान होण्यापूर्वीच डेंग्यू संशयित म्हणून जाहीर केले जात असल्याने त्यावर महापालिकेने चाप लावण्याचे ठरविले आहे.