शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:25 IST

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. ...

ठळक मुद्देखमताणे : हाताला नाही काम, प्यायला नाही पाणी, मजुरांना फटका

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ वर्षानुवर्षे पुजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजुर लावायची वेळेच येत नाही. पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दुध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मंजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहे.नुकतेच ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजुर चालु वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालु असताना उपजीविका भागत होती, मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा माणसे असल्याने उपजिविका भागवायची कशी हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे . त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सिमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लबिंग, वीटभट्टीवरील मजुर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने चित्र आहे.गाव सोडून पोटा पाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतु लागले आहे.आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या ऊसाच्या बांड्यांमुळे गुरांंच्या चारा-पाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता मात्र या ऊसतोड कामगारांसाठी गंभीर ठरत आहे.शहर व ग्रामीण भागात बांधकाम सुरू राहिल्यावर आमच्या छोट्या मालवाहू गाड्यांना दरवाजा, सिमेंट वाहतुकीसाठी भाडे मिळत असे. परंतु दुष्काळामुळे सर्व बांधकाम बंद झाल्याने छाट्या वाहनधारकांना उपासमारीची वेळ आली आहे.- पप्पू पवार,गाडीचालक, खमताणे.ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार आता घरी परतत आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यां पाल्यांना ते घरीच ठेवत असल्याचा त्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.- वैभव बागुल,शेतकरी, खमताणे.