शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून करावी लागते नदीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:52 IST

सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसोनेवाडीच्या ग्रामस्थांची व्यथा : रस्ताच नसल्याने संपर्कात अडचणी

सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्याच्या सोनेवाडी शिवारात म्हाळुंगी नदीवर सन १९७२ साली सर्वात मोठे मातीचे भोजापूर धरणाची निर्मिती झाली. धरणाच्या खालील बाजूस आदिवासी ठाकर समाजाची अंदाजे १२००च्या आसपास लोकसंख्या आहे. काळशेतवाडी, खटकळी, खड्याची वाडी, न्हाईनदरा अशी विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यापैकी नदीच्या डाव्या तीरावरील खड्याची वाडी, न्हाईनदरा या भागातील आदिवासी बांधवांना सोनेवाडी गावशी संपर्क साधण्यासाठी किंवा गावात जाण्यासाठी रस्ता नाही. दोन्हीही वस्तीच्या ग्रामस्थांना पाऊल वाटेने जीव धोक्यात घालून धरणाचे सांडव्यावरून ंिकंवा धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर सांडव्याच्या आतील बाजूने गावांशी संपर्क करावा लागत आहे.भोजापूर धरण होण्यापूर्वी या भागातील ग्रामस्थांना गावात येण्या-जाण्यासाठी येथून रस्ता होता धरण झाल्यानंतर शासनामार्फत एकाही पक्क्या रस्त्याची व्यवस्था केली नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसात येथील ग्रामस्थांना सोनेवाडी गावात जाण्यासाठी चास-कासारवाडीमार्गे अंदाजे ८ ते १० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. उन्हाळा व हिवाळ्याच्या दिवसातही पाऊलवाटेचाच वापर त्यांना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षाची असलेली अडचण लोकप्रतिनिधी व शासनाने लक्षात घेऊन पूल अथवा चांगल्या प्रतीच्या रस्त्याची गरज असल्याची भावना आदिवासी बांधव प्रकाश वारे, सीताराम उघडे, भारत उघडे, जगन वारघडे, बाजीराव गावंडे, पंढरीनाथ भले, भास्कर गावंडे, दगडू रावले, अमृता वारे, शंकर वारघडे, धोंडिबा भले, बबन मेंगाळ, नितीन गांगड, वाळीबा वारे आदींनी व्यक्त केली आहे. म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर गावात जाण्यासाठी रस्ता नसतो. नदीला गुडघाभर पाणी असल्याने चासमार्गे जावे लागते. नदीला पूर आला असल्याने गेल्या १३ ते १४ दिवसांपासून वाडी-वस्तीवरील मुले कासारवाडी येथे शाळेत जाऊ शकलेली नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.- सीताराम उघडे, ग्रामस्थ. वाडी व वस्ती परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या पात्रातील पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालून पावसाळ्यात अशीच तारेवरची कसरत करावी लागते. सोनेवाडी गावात शासकीय काम किंवा दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो.-भारत उघडे, ग्रामस्थ.