शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

जीव धोक्यात घालून करावी लागते नदीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:52 IST

सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसोनेवाडीच्या ग्रामस्थांची व्यथा : रस्ताच नसल्याने संपर्कात अडचणी

सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्याच्या सोनेवाडी शिवारात म्हाळुंगी नदीवर सन १९७२ साली सर्वात मोठे मातीचे भोजापूर धरणाची निर्मिती झाली. धरणाच्या खालील बाजूस आदिवासी ठाकर समाजाची अंदाजे १२००च्या आसपास लोकसंख्या आहे. काळशेतवाडी, खटकळी, खड्याची वाडी, न्हाईनदरा अशी विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यापैकी नदीच्या डाव्या तीरावरील खड्याची वाडी, न्हाईनदरा या भागातील आदिवासी बांधवांना सोनेवाडी गावशी संपर्क साधण्यासाठी किंवा गावात जाण्यासाठी रस्ता नाही. दोन्हीही वस्तीच्या ग्रामस्थांना पाऊल वाटेने जीव धोक्यात घालून धरणाचे सांडव्यावरून ंिकंवा धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर सांडव्याच्या आतील बाजूने गावांशी संपर्क करावा लागत आहे.भोजापूर धरण होण्यापूर्वी या भागातील ग्रामस्थांना गावात येण्या-जाण्यासाठी येथून रस्ता होता धरण झाल्यानंतर शासनामार्फत एकाही पक्क्या रस्त्याची व्यवस्था केली नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसात येथील ग्रामस्थांना सोनेवाडी गावात जाण्यासाठी चास-कासारवाडीमार्गे अंदाजे ८ ते १० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. उन्हाळा व हिवाळ्याच्या दिवसातही पाऊलवाटेचाच वापर त्यांना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षाची असलेली अडचण लोकप्रतिनिधी व शासनाने लक्षात घेऊन पूल अथवा चांगल्या प्रतीच्या रस्त्याची गरज असल्याची भावना आदिवासी बांधव प्रकाश वारे, सीताराम उघडे, भारत उघडे, जगन वारघडे, बाजीराव गावंडे, पंढरीनाथ भले, भास्कर गावंडे, दगडू रावले, अमृता वारे, शंकर वारघडे, धोंडिबा भले, बबन मेंगाळ, नितीन गांगड, वाळीबा वारे आदींनी व्यक्त केली आहे. म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर गावात जाण्यासाठी रस्ता नसतो. नदीला गुडघाभर पाणी असल्याने चासमार्गे जावे लागते. नदीला पूर आला असल्याने गेल्या १३ ते १४ दिवसांपासून वाडी-वस्तीवरील मुले कासारवाडी येथे शाळेत जाऊ शकलेली नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.- सीताराम उघडे, ग्रामस्थ. वाडी व वस्ती परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या पात्रातील पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालून पावसाळ्यात अशीच तारेवरची कसरत करावी लागते. सोनेवाडी गावात शासकीय काम किंवा दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो.-भारत उघडे, ग्रामस्थ.