शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ग्रामिण भागात पांरपारिक खेळांची दांडी गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्र ीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबतच ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जात होते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदललेले असून ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांची बोटेही संगणक व मोबाईलवर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे अर्थात आधुनिकतेच्या काळात बालपणीच्या खेळाची धमाल आता हरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

देवगांव : विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्र ीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबतच ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जात होते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदललेले असून ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांची बोटेही संगणक व मोबाईलवर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे अर्थात आधुनिकतेच्या काळात बालपणीच्या खेळाची धमाल आता हरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.  पूर्वी खेळल्या जाणार्या विट्टी दांडू ,कबड्डी, लंगडी, लपंडाव, आट्या पाट्या, सूर पारंब्या, चोर पोलीस, सागरगोट्या, लगोरी, कबड्डी, खो-खो, गलोल, असे अनेकविध खेळ आजच्या मोबाईल, संगणक, इंटरनेट, कार्टून , व्हीडीओ गेमच्या जमान्यात नामशेष होत आहे.  गावातील मैदानी खेळ , गल्लीतील धमाल , खेळाची मजा लुटणारे निरागस बालके दिसेनासे झाले आहे या उलट शाळेच्यावेळेशिवाय मुले संगणक किंवा टीव्ही कार्टून्स मध्ये रमताना दिसत आहे काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे.पारंपारिक मैदानी खेळामुळे मुलांची शारीरिक जडण घडण होऊन शरीर पिळदार बनत होते एक प्रकारे खेळांच्या माध्यमातून शरीरांची हालचाल होऊन मुलांचा चांगला व्यायाम व्हायचा त्यामुळे शरीरा बरोबरच बुद्धीलाही चांगली चालना मिळायची परंतु सदर खेळ हे या संगणक युगात कालबाह्य झाले असून आज घरा घरात संगणकाबरोबरच मोबाईल चा वापर होत असून बालकवर्ग आॅनलाईन ला ते प्राध्यान्य देत आहे शाळेचा वेळ वगळता जस ङ्क्त जसा वेळ मिळेल तसे मुले मोबाईल , संगणकाचा ताबा घेत आहेत. आजचे युग स्पर्धेचे आहे यात आपली बालके टिकली पाहिजे हा गवगवा जरी खरा असला तरी पालकांच्या अपेक्षेमुळे मुले शारीरिक,बौद्धिक, खेळांना हद्दपार करून एकाच ठिकाणी तासनतास बसून बालपण हिरावून घेत आहे. ‘‘बालपण देगा देवा.......’’ अश्या अभंगाच्या माध्यमातून संतासह कविंनीही बालपनाचे गोड कौतुक केले आहे मात्र आधुनुकतेच्या नावाखाली पारंपारिक खेळांची दांडी गुल होत आहे. मित्रत्वात सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी तसेच शरीराला व्यायाम मिळण्यासाठी व मानिसक आनंदासाठी पारंपारिक खेळ महत्वाचे असतांना या खेळांना बगल दिली जात आहे. या मुळे बालकांच्या मानिसकतेबरोबरच आरोग्यावर परिणाम होत आहे.मैदानी खेळांच्या अभावी बालकांमध्ये नेत्रिवकार, मणक्याचे आजार, पाठ कंबरदुखी आदी आजार बळावत आहे हे मात्र नक्की.‘‘पुरातन काळापासून आपण अनेक खेळ परंपरा जोपासत आलो आहोत. परंतू आधुनिकतेकडे वळतांना जुने खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याला जबाबदार आपणच आहोत. मुले मोबाईलवर गेम खेळतांना किंवा टि ?ही वर कार्टून पाहतांना आपण बघतो पण त्याकडे लाडामुळे दुर्लक्ष करतो. त्याला म्हणतो की, तुझ मोबाईल वर गेम खेळून झाल्यावर किंवा कार्टुन पाहील्यानंतर अभ्यास कर. यामुळे पालकच त्यांना प्रोत्साहन देतात असे वाटते. कधी - कधी तर मित्रपरिवारात मोठया अभिमानाने सांगतात, माझा मुलगा मोबाईलच्या बाबतीत फार हुशार आहे. यामुळे नकळत आपलेच दुर्लक्ष होतय हे मात्र नक्की. याउलट गल्लीतील पाच -सहा मुलांना एकत्र करून व स्वत: अर्धा तास का होईना त्यांच्या कडून दररोज एखादा खेळ उदा . लंगडी,आटया- पाटया, लंपडाव इ. असे खेळ शिकवले पाहिजेत. जेणेकरून पालकही टि ?ही कमी पाहतील व सर्वच मुलांवर लक्षही राहील. व यातून एक जिव्हाळा निर्माण होईल.- संदिप हिरे, जि.प.शिक्षक देवगावं.

टॅग्स :Sportsक्रीडा