शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साकोऱ्यात पाणीटंचाईमुळे हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:28 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते पाणी प्रत्येकाला मिळत नसल्याने गावातील काही महिला आणि पुरु षांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हंडा मोर्चा काढून आपली कैफियत मांडून सदर पाणी नळाद्वारे सोडण्याची मागणी केली.

ठळक मुद्देटँकरची मागणी : ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते पाणी प्रत्येकाला मिळत नसल्याने गावातील काही महिला आणि पुरु षांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हंडा मोर्चा काढून आपली कैफियत मांडून सदर पाणी नळाद्वारे सोडण्याची मागणी केली.गतवर्षी पावसाळ्यात या परिसरात सरासरी अवघा ३० टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच कोणतेही नियोजन न केल्याने आज नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात सन २०११च्या जनगणनेनुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अवघ्या चार टँकरची व्यवस्था केली होती. त्यातही वाड्यावस्त्यांवर १२ हजार लिटरचे एक टँकर, तर गावासाठी तीन टँकरद्वारे एकूण दिवसाला दीड लाख लिटर पाणी गावाच्या चार बाजूला असलेल्या हौदात सोडले जात होते.बुधवारी (दि.१०) सकाळी गावातील काही महिला-पुरु षांनी याविरोधात रिकामे हंडे होती घेत ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा नेऊन आम्हाला पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत शासनाने गावाच्या १६ हजार लोकसंख्येचा विचार करता टँकरची संख्या वाढवून सर्व पाणी जलकुंभात टाकून गावात एकूण ८५० नळधारकांना एकूण १४ विभागणीत पाणीवाटप करावे, अशी जोरदार मागणी केली. त्यावर नवनिर्वाचित सरपंच अलका कदम, उपसरपंच संदीप बोरसे, रमेश बोरसे, संजय सुरसे आदींनी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामविकास अधिकारी बी. बी. सरोदे यांची अनुपिस्थती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.मोर्चात छाया सुरसे, सुवर्णा मोरे, मंगल मोरे, निर्मला वाघ, चंद्रकला बोरसे, सुरेखा बोरसे, चंद्रकला बच्छाव, उषाबाई सुरसे, संगीता बोरसे, उज्ज्वला देशमुख, सुनीता बोरसे, रमाबाई जाधव, आशा बोरसे, वसंत बोरसे, धरमचंद कासलीवाल, शरद सोनवणे, माणिक हिरे, प्रताप बोरसे, शरद बोरसे, सुनंदा बोरसे, संगीता आहिरे, शोभा बोरसे, संदीप जाधव, नंदाबाई बच्छाव आदी सहभागी झाले होते.अनेक कुटुंबांना हे पाणी मिळत नसल्याने तसेच एखाद्या दिवशी एखादे टँकर न आल्यास पाणीवाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडून जात आहे. आता तर गेल्या तीन दिवसांपासून अवघे तीनच टँकर येत असून, टॅँकरने पुरविले जाणारे पाणी पिवळसर असून, ते पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.