शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साकोऱ्यात पाणीटंचाईमुळे हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:28 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते पाणी प्रत्येकाला मिळत नसल्याने गावातील काही महिला आणि पुरु षांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हंडा मोर्चा काढून आपली कैफियत मांडून सदर पाणी नळाद्वारे सोडण्याची मागणी केली.

ठळक मुद्देटँकरची मागणी : ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते पाणी प्रत्येकाला मिळत नसल्याने गावातील काही महिला आणि पुरु षांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हंडा मोर्चा काढून आपली कैफियत मांडून सदर पाणी नळाद्वारे सोडण्याची मागणी केली.गतवर्षी पावसाळ्यात या परिसरात सरासरी अवघा ३० टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच कोणतेही नियोजन न केल्याने आज नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात सन २०११च्या जनगणनेनुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अवघ्या चार टँकरची व्यवस्था केली होती. त्यातही वाड्यावस्त्यांवर १२ हजार लिटरचे एक टँकर, तर गावासाठी तीन टँकरद्वारे एकूण दिवसाला दीड लाख लिटर पाणी गावाच्या चार बाजूला असलेल्या हौदात सोडले जात होते.बुधवारी (दि.१०) सकाळी गावातील काही महिला-पुरु षांनी याविरोधात रिकामे हंडे होती घेत ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा नेऊन आम्हाला पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत शासनाने गावाच्या १६ हजार लोकसंख्येचा विचार करता टँकरची संख्या वाढवून सर्व पाणी जलकुंभात टाकून गावात एकूण ८५० नळधारकांना एकूण १४ विभागणीत पाणीवाटप करावे, अशी जोरदार मागणी केली. त्यावर नवनिर्वाचित सरपंच अलका कदम, उपसरपंच संदीप बोरसे, रमेश बोरसे, संजय सुरसे आदींनी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामविकास अधिकारी बी. बी. सरोदे यांची अनुपिस्थती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.मोर्चात छाया सुरसे, सुवर्णा मोरे, मंगल मोरे, निर्मला वाघ, चंद्रकला बोरसे, सुरेखा बोरसे, चंद्रकला बच्छाव, उषाबाई सुरसे, संगीता बोरसे, उज्ज्वला देशमुख, सुनीता बोरसे, रमाबाई जाधव, आशा बोरसे, वसंत बोरसे, धरमचंद कासलीवाल, शरद सोनवणे, माणिक हिरे, प्रताप बोरसे, शरद बोरसे, सुनंदा बोरसे, संगीता आहिरे, शोभा बोरसे, संदीप जाधव, नंदाबाई बच्छाव आदी सहभागी झाले होते.अनेक कुटुंबांना हे पाणी मिळत नसल्याने तसेच एखाद्या दिवशी एखादे टँकर न आल्यास पाणीवाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडून जात आहे. आता तर गेल्या तीन दिवसांपासून अवघे तीनच टँकर येत असून, टॅँकरने पुरविले जाणारे पाणी पिवळसर असून, ते पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.