शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

धरणसाठ्या वाढ, मात्र गतवर्षाच्या तुलनेत कमीच

By admin | Updated: July 14, 2017 18:18 IST

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले असून, अन्य धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी १५ जुलै रोजी सर्व धरणांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा होता, यंदा मात्र हेच प्रमाण २९ टक्के इतकेच आहे. तर गंगापूर धरणात ६५ टक्के पाणी होते, यंदा फक्त ५२ टक्के पाणी साठले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वदूर झोडपून काढल्याने नद्या, नाल्यांना पाणी आले असून, विशेष करून त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासांत १२५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम गोदावरीच्या व पर्यायाने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ होण्यास झाली आहे. अशीच परिस्थिती दारणाची असून, इगतपुरी तालुक्यात १९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, त्यामुळे तालुक्यातील अन्य धरणांच्या पाण्यात वाढ होण्याबरोबरच दारणा धरणात ७१ टक्के पाणी साठले आहे. पावसाचा जोर कायम असल्याचे पाहून शुक्रवारी सकाळी दारणाधरणातून नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. पावसाच्या पुनरागमनाने धरणसाठ्यात होणारी वाढ पाहता जिल्ह्याचा पाणीप्रश्न काही अंशी सुटण्यास मदत झाली असून, गंगापूर धरण समूहात ४१ टक्के पाणी साठले आहे, तर पालखेड धरण समूहात अवघे नऊ टक्के पाणी आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सततच्या हजेरीने दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा व नांदुरमधमेश्वर या धरणांमध्ये एखूण ४२ टक्के पाणी साठले आहे. गिरणा खोऱ्यात २३ टक्के पाणी आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम असल्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.