शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

धरणसाठ्या वाढ, मात्र गतवर्षाच्या तुलनेत कमीच

By admin | Updated: July 14, 2017 18:18 IST

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले असून, अन्य धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी १५ जुलै रोजी सर्व धरणांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा होता, यंदा मात्र हेच प्रमाण २९ टक्के इतकेच आहे. तर गंगापूर धरणात ६५ टक्के पाणी होते, यंदा फक्त ५२ टक्के पाणी साठले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वदूर झोडपून काढल्याने नद्या, नाल्यांना पाणी आले असून, विशेष करून त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासांत १२५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम गोदावरीच्या व पर्यायाने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ होण्यास झाली आहे. अशीच परिस्थिती दारणाची असून, इगतपुरी तालुक्यात १९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, त्यामुळे तालुक्यातील अन्य धरणांच्या पाण्यात वाढ होण्याबरोबरच दारणा धरणात ७१ टक्के पाणी साठले आहे. पावसाचा जोर कायम असल्याचे पाहून शुक्रवारी सकाळी दारणाधरणातून नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. पावसाच्या पुनरागमनाने धरणसाठ्यात होणारी वाढ पाहता जिल्ह्याचा पाणीप्रश्न काही अंशी सुटण्यास मदत झाली असून, गंगापूर धरण समूहात ४१ टक्के पाणी साठले आहे, तर पालखेड धरण समूहात अवघे नऊ टक्के पाणी आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सततच्या हजेरीने दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा व नांदुरमधमेश्वर या धरणांमध्ये एखूण ४२ टक्के पाणी साठले आहे. गिरणा खोऱ्यात २३ टक्के पाणी आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम असल्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.