शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

नुकसान पन्नास गावांचे, भरपाई दहा गावांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

बागलाण तालुक्यात गेल्या १८ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घालून मोसम, करंजाडी, कान्हेरी खोऱ्याला झोडपले होते. ...

बागलाण तालुक्यात गेल्या १८ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घालून मोसम, करंजाडी, कान्हेरी खोऱ्याला झोडपले होते. यात पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली होती. पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक कांदा पीक बाधित झाले तर गहू , हरभरा टमाटा, मिरची, अन्य भाजीपाला पीक, डाळिंब पिकाची हानी झाली होती. असे असताना बागलाण तालुक्यातील दहा गावांना फक्त १ कोटी ५४ लाख रुपयांची तुटपुंजी भरपाई देऊन बोळवण केली असल्याची टीका आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यासोबतच उर्वरित नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

इन्फो

या गावांना मिळणार भरपाई

१८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या फळ पीक वगळून कांदा, कारले, मिरची, टमाटा, गहू, हरभरा पिकांना १ कोटी ५४ लाख ६७ हजार ४५ रुपये भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेवरे येथील २, पिंगळवाडे येथील १७, विजय नगर येथील ४९, ताहाराबाद येथील १२७ ,रावेर येथील २४३ , मुल्हेर येथील ९, अंतापूर येथील ९०३ ,अंबासन येथील १५८ ,मोराणे येथील ५३ आणि काकडगाव येथील १२ अशा एकूण १५७३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.