शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

संततधारेमुळे शेतीसह पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नांदगावसह साकोरा ...

साकोरा : नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नांदगावसह साकोरा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीला चांगलाच फटका बसला असून, शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी शेती नापिकी झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

तीन आठवड्यांपूर्वीच नांदगावसह साकोरा परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून बळीराजा अजून सावरलेला नसताना गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने अनेक ठिकाणी कोबी पिकावर रोग आल्याने शेतकऱ्यांनी कोबीवर रोटोव्हेटर फिरवून पीक नष्ट केले. आता मका, सोयाबीन, कांदे, कांदारोप, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला असून, संततधारेने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने बळीराजा हताश झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी या भागात सलग तीन दिवस चाललेल्या संततधारेने चांगलाच धुमाकूळ घातल्याने साकोरा-नांदगाव रस्त्याशेजारील मोरखडी बंधारा फुटल्याने त्याखाली असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नदी-नाल्यांनी रौद्र रूप धारण केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे तालुक्यातील तब्बल २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटिल यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आता तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केल्याने जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे.

--------------------

आर्थिक संकट

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा आर्थिक फटका बसला आहे. अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांकडून यावर्षी भरपाई न मिळाल्याने बळीराजाने उसनवार, कर्ज घेऊन खरीप हंगाम सुरू केला होता. उशिरा आलेल्या पावसाने यावर्षी पिकांना चांगले जीवदान मिळाले होते. त्यामुळे खरीप हंगाम यावर्षी साधणार अशी आशा बळीराजाला लागली होती. मात्र आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची वाताहत झाली असून, शेतशिवारात साचलेल्या पाण्यातून पीक काढावे तरी कसे अशा विवंचनेत बळीराजा आहे. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.