शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

देवळा तालुक्याच्या पुर्व भागात अतीपावसाने शेतीपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:44 IST

उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआर्थिक फटका : तहसिलदारांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश

उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरवाड्यापासुन तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील सांगावी,कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा आदी गावांमध्ये अतीपावसाने मका, बाजारी, तुर, लाल पावसाळी कांद्याचे रोपे, लाल कांदे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णत: वाया जाऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होताच आमदार राहुल अहेर यांच्यासह देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, तलाठी एस.एस.पवार, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे, शेतकी संघाचे संचालक संदिप देवरे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भरत देवरे आदींनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. तसेच शेतकर्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. यावेळी राहुल अहेर यांनी नुकसानीबाबत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतपिकांचे लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतीपावसाने चार एकर मका शेतात पाणी साचल्याने शेत उपळले आहे.परिणामी संपुर्ण मका पिक वाया गेल्याने संकट ओढावले आहे. शासनाने पंचनामे करुन तात्काळ नुकसानभरपाई मिळवुन द्यावी. -बाळासाहेब देवरे, नुकसानग्रस्त शेतकरी 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी