शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:31 IST

मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.

मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.कल बुधवारी शहरासह तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. यात सुदैवाने जीवितहानी टळली. तालुक्यातील निमगाव येथे एक गाय, वडनेर येथे एक म्हैस, कौळाणे निं येथे सर्वाधिक म्हणजे एक म्हैस, तीन पारडू , दहा मेंढ्या ठार झाल्या; तर दाभाडीत एक शेळी ठार झाली, घरांचे नुकसान मालेगाव तालुक्यात २७ कच्ची घरे वादळात कोसळून नुकसान झाले.यात झोडगे येथे २, निमगाव ला ४, वडनेर ला १, मालेगाव ला २, कौळाने निं ला२, सायनेत ५ दाभाडीत ६ , करांजगव्हानला ३ तर सौंदाणेत २ कच्ची घरे पडून नुकसान झाले. ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाले.यात दाभाडीत ६ आणि सौंदाणेत एका पक्क्या घराचे वादळात अंशत: नुकसान झाले. दाभाडी मंडळात ३५क्विंटल कांद्याचे पावसात भिजल्याने नुकसान झाले--------------------------देवळा : चक्र ीवादळामुळे झालेल्या पावसात तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली.चक्र ीवादळ येणार असल्याची पूर्वकल्पना हवामान खात्याने दिलेली असल्यामुळे तालुक्यातील शासकीय यंत्रणा, व नागरिक सतर्क झाले होते. सोशल मिडिया, तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने नागरिकांना चक्र ीवादळाबाबत पूर्वसूचना देण्यात येऊन याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली होती. यामुळे शेतकरी वर्गाने शेतात उघडयावर असलेल्या भुईमुग, मका आदी पिकांबाबत योग्य ती काळजी घेतली व चाळीत साठवलेला कांदा भिजू नये याबाबत खबरदारी घेतल्यामुळे तालुक्यात शेती पीकांचे कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच नागरिकांनी दिवसभर घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे रस्त्यावरील रहदारी रोडावली होती. दिवसभर शांत असलेल्या हवेने रात्री रौद्ररूप धारण केले होते. त्यातच पाऊसही सुरू होता. यामुळे तालुक्यातील पंडित भिका आहिरे (देवळा), पांडुरंग सखाराम सूर्यवंशी (फुलेनगर), सखुबाई महादू सोनवणे (मेशी), भिकुबाई बधा बागुल (मेशी), रामचंद्र लक्ष्मण आहेर (विठेवाडी), धनजी श्रीपत जाधव ( खर्डे) आदी शेतकर्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांच्या घरांचा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक