शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:53 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या दरम्यान पावसाने दडी मारल्याने गंभीर संकट उभे राहिले होते. त्यावेळी मराठवाड्यासाठी असलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. राज्यातील भाजपा सरकारने तसा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दोन वर्षे चांगला पाऊस होत आहे. यंदाही जून आणि जुलै या दोन महिन्यांत मुबलक पाऊस असून, दहा धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही मुबलक पाणी असल्याने विसर्ग करावा लागला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच महापालिकेने अनेक ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा आजही कायम ठेवला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना पाण्याचे कोणतेही नियोजन होत नाही. गंगापूर धरणातील हे पाणी जाणीवपूर्वक राखीव ठेवून नजीकच्या काळात ते मराठवाड्यासाठी देण्याचा भाजपाचा घाट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. नाशिक शहराला गरजेपुरते पाणी मिळत असताना नाशिकमध्ये पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप मराठवाड्यातील राजकीय नेत्यांकडून केला जातो. सध्या गरजेनुसार पाणी न वापरता नागरिकांना त्रास देऊन पाण्याची बचत केली जात आहे, तसे झाल्यास नाशिककरांना इतक्या पाण्याची गरज नाही हे मराठवाड्याचे म्हणणे खरे होऊ शकेल, असे बोरस्ते म्हणाले. गंगापूर धरण भरल्यानंतर महापौरांनी जलपूजन केले तेव्हाच ही मागणी आपण केली होती. परंतु तरीही त्याची दखल सत्ताधिकाºयांनी घेतली नसल्याचे बोरस्ते म्हणाले.