शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नीचांकी दरामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ ...

पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ रुपयेदेखील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सध्या दुधाचे दर २५ रुपयांपेक्षाही कमी म्हणजे सुमारे २२ ते २४ रुपये इतका नीचांकी आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. गेल्या एक वर्षापासून दुधाच्या दरात सतत घसरण होत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची या व्यवसायाची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. सध्या तरी ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने दोन वर्षांपासून खासगी टँकरचे विकत पाणी तसेच बाहेरगावावरून चारा आणावा लागत नसला तरी दूधवाढीसाठी अनेक प्रकारचे औषध, ढेप, सरकी, यासारख्या खाद्यवस्तू शेतकऱ्यांना खरेदी कराव्या लागतात. सरकीच्या ५० किलो पोत्याचा दर १८००, तर कांडीच्या ५० किलो पोत्याच्या दर १४०० रुपयांपर्यंत आहे. एका गाईला सरकीचे एक पोते साधारण ६ ते ८ दिवस पुरते. त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.

कोट....

दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर होणे गरजेचे आहे. तसेच दुधाला प्रतिलीटर ३० ते ३५ रुपयांच्या पुढे भाव मिळणे गरजेचे असून, गेल्या वर्षभरात दुधाच्या भावात सातत्याने घसरण झाली आहे. ही घसरण कायम राहिली, तर शेतकऱ्यांना जोडधंदा बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच दुधाबरोबर शेतमालालाही चांगला भाव मिळून स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे.

-आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

कोट....

दोन ते तीन वर्षांपासून दुधाचे भाव वाढलेले नाहीत. परंतु दुधवाढी लागणाऱ्या वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत. सध्यातरी २२ रुपये दर पडत आहे. तोच दर सुमारे ३० रुपयेपर्यंत गेला तर दुग्ध व्यवसाय परवडेल. नाहीतर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल.

- बाबासाहेब शिंदे, शेतकरी