शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नीचांकी दरामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ ...

पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ रुपयेदेखील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.

ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सध्या दुधाचे दर २५ रुपयांपेक्षाही कमी म्हणजे सुमारे २२ ते २४ रुपये इतका नीचांकी आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. गेल्या एक वर्षापासून दुधाच्या दरात सतत घसरण होत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची या व्यवसायाची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. सध्या तरी ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने दोन वर्षांपासून खासगी टँकरचे विकत पाणी तसेच बाहेरगावावरून चारा आणावा लागत नसला तरी दूधवाढीसाठी अनेक प्रकारचे औषध, ढेप, सरकी, यासारख्या खाद्यवस्तू शेतकऱ्यांना खरेदी कराव्या लागतात. सरकीच्या ५० किलो पोत्याचा दर १८००, तर कांडीच्या ५० किलो पोत्याच्या दर १४०० रुपयांपर्यंत आहे. एका गाईला सरकीचे एक पोते साधारण ६ ते ८ दिवस पुरते. त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.

कोट....

दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर होणे गरजेचे आहे. तसेच दुधाला प्रतिलीटर ३० ते ३५ रुपयांच्या पुढे भाव मिळणे गरजेचे असून, गेल्या वर्षभरात दुधाच्या भावात सातत्याने घसरण झाली आहे. ही घसरण कायम राहिली, तर शेतकऱ्यांना जोडधंदा बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच दुधाबरोबर शेतमालालाही चांगला भाव मिळून स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे.

-आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

कोट....

दोन ते तीन वर्षांपासून दुधाचे भाव वाढलेले नाहीत. परंतु दुधवाढी लागणाऱ्या वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत. सध्यातरी २२ रुपये दर पडत आहे. तोच दर सुमारे ३० रुपयेपर्यंत गेला तर दुग्ध व्यवसाय परवडेल. नाहीतर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल.

- बाबासाहेब शिंदे, शेतकरी