शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:00 IST

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीयघटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. त्यासाठी पदाधिकाºयांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या पुण्यात यशदाच्या माध्यमातून, असे प्रशिक्षण दिले जात असले तरी ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक पदाधिकाºयांना हे प्रशिक्षण घेणे शक्य होत नसल्याने शासनाकडून जिल्हास्तरावर पदाधिकारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.५) विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे,अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षांचा कालवधी उलटला असताना स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारकडून राबविण्यात येणाºया विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. अनेक ग्रामीण वाड्या-वस्त्यांसह विविध गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरासह विविध ग्रामीण भागात वस्त्र व निवाºयापासून वंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायद्याच्या चौकटीत नियोजनबद्ध योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवकांसह स्थानिक स्वराचे संस्थांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. कुलगुरू ई. वायुनंदन यांनी प्रास्ताविक करताना विभागीय परिषदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीनंतर साध्य होऊ न शकलेल्या कामांवर व योजनांवर चर्चा होणार असल्याने घटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणे अधिक सहज व सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी केले. प्रा. रघुनाथ गावडे यांनी आभार मानले.प्रगती व पुढील दिशामुक्त विद्यापीठातील विभागीय परिषदेत ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतरच्या २५ वर्षांत झालेली ‘प्रगती व पुढील दिशा’ यविषयाला अनुसरून‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्पर संबंध’ विषयावर पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्व समावेशक प्रशासन व निवडणूक सुधारणा आदी विषयांवरही चर्चा झाली, तर अखेरच्या सत्रात दिवसभरात झालेल्या विविध विषयांवर खुल्या चर्चासत्रानंतर परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेचे विभागातील पाचही जिल्ह्णात थेट प्रक्षेपण करण्यात आले.उद््घाटनाच्या समारोपाला महापौरांचे आगमनपरिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी यांची अनुपस्थिती जाणवत असतानाच त्यांचे आगमन झाले. परंतु तोपर्यंत उद्घाटन सोहळा आटोपून आभार प्रदर्शनाचे सोपस्कर सुरू झाले होते. याचवेळी महापौरांसह उपमहापौर अजिंक्य गिते, गटनेते दिनकर पाटील यांचे आगमन झाल्याने आभार प्रदर्शन थांबवून महापौरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उशिराने पोहोचण्याच्या सवयींवर चांगलीच चर्चा रंगली.