शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:00 IST

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीयघटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. त्यासाठी पदाधिकाºयांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या पुण्यात यशदाच्या माध्यमातून, असे प्रशिक्षण दिले जात असले तरी ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक पदाधिकाºयांना हे प्रशिक्षण घेणे शक्य होत नसल्याने शासनाकडून जिल्हास्तरावर पदाधिकारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.५) विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे,अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षांचा कालवधी उलटला असताना स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारकडून राबविण्यात येणाºया विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. अनेक ग्रामीण वाड्या-वस्त्यांसह विविध गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरासह विविध ग्रामीण भागात वस्त्र व निवाºयापासून वंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायद्याच्या चौकटीत नियोजनबद्ध योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवकांसह स्थानिक स्वराचे संस्थांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. कुलगुरू ई. वायुनंदन यांनी प्रास्ताविक करताना विभागीय परिषदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीनंतर साध्य होऊ न शकलेल्या कामांवर व योजनांवर चर्चा होणार असल्याने घटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणे अधिक सहज व सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी केले. प्रा. रघुनाथ गावडे यांनी आभार मानले.प्रगती व पुढील दिशामुक्त विद्यापीठातील विभागीय परिषदेत ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतरच्या २५ वर्षांत झालेली ‘प्रगती व पुढील दिशा’ यविषयाला अनुसरून‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्पर संबंध’ विषयावर पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्व समावेशक प्रशासन व निवडणूक सुधारणा आदी विषयांवरही चर्चा झाली, तर अखेरच्या सत्रात दिवसभरात झालेल्या विविध विषयांवर खुल्या चर्चासत्रानंतर परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेचे विभागातील पाचही जिल्ह्णात थेट प्रक्षेपण करण्यात आले.उद््घाटनाच्या समारोपाला महापौरांचे आगमनपरिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी यांची अनुपस्थिती जाणवत असतानाच त्यांचे आगमन झाले. परंतु तोपर्यंत उद्घाटन सोहळा आटोपून आभार प्रदर्शनाचे सोपस्कर सुरू झाले होते. याचवेळी महापौरांसह उपमहापौर अजिंक्य गिते, गटनेते दिनकर पाटील यांचे आगमन झाल्याने आभार प्रदर्शन थांबवून महापौरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उशिराने पोहोचण्याच्या सवयींवर चांगलीच चर्चा रंगली.