शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:00 IST

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीयघटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. त्यासाठी पदाधिकाºयांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या पुण्यात यशदाच्या माध्यमातून, असे प्रशिक्षण दिले जात असले तरी ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक पदाधिकाºयांना हे प्रशिक्षण घेणे शक्य होत नसल्याने शासनाकडून जिल्हास्तरावर पदाधिकारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.५) विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे,अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षांचा कालवधी उलटला असताना स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारकडून राबविण्यात येणाºया विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. अनेक ग्रामीण वाड्या-वस्त्यांसह विविध गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरासह विविध ग्रामीण भागात वस्त्र व निवाºयापासून वंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायद्याच्या चौकटीत नियोजनबद्ध योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवकांसह स्थानिक स्वराचे संस्थांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. कुलगुरू ई. वायुनंदन यांनी प्रास्ताविक करताना विभागीय परिषदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीनंतर साध्य होऊ न शकलेल्या कामांवर व योजनांवर चर्चा होणार असल्याने घटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणे अधिक सहज व सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी केले. प्रा. रघुनाथ गावडे यांनी आभार मानले.प्रगती व पुढील दिशामुक्त विद्यापीठातील विभागीय परिषदेत ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतरच्या २५ वर्षांत झालेली ‘प्रगती व पुढील दिशा’ यविषयाला अनुसरून‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्पर संबंध’ विषयावर पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्व समावेशक प्रशासन व निवडणूक सुधारणा आदी विषयांवरही चर्चा झाली, तर अखेरच्या सत्रात दिवसभरात झालेल्या विविध विषयांवर खुल्या चर्चासत्रानंतर परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेचे विभागातील पाचही जिल्ह्णात थेट प्रक्षेपण करण्यात आले.उद््घाटनाच्या समारोपाला महापौरांचे आगमनपरिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी यांची अनुपस्थिती जाणवत असतानाच त्यांचे आगमन झाले. परंतु तोपर्यंत उद्घाटन सोहळा आटोपून आभार प्रदर्शनाचे सोपस्कर सुरू झाले होते. याचवेळी महापौरांसह उपमहापौर अजिंक्य गिते, गटनेते दिनकर पाटील यांचे आगमन झाल्याने आभार प्रदर्शन थांबवून महापौरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उशिराने पोहोचण्याच्या सवयींवर चांगलीच चर्चा रंगली.