शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST

राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

मालेगाव : राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळ धुळेकडून येणाºया कंटेनर क्रमांक एच. आर. ५५ ए. बी. ५०६६ याने रस्ता ओलांडणाºया दुचाकी क्र. एम.एच.४१ एम. २७४५ हिला जबर धडक दिली. या भीषण अपघातात संजय अर्जुन पवार (३४) रा. आदिवासी वस्ती व अवि विजय जाधव (१३), ऋषीकेश राजेंद्र जाधव (९) दोघे रा. टेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या टेहरे ग्रामस्थांनी मुंबई-आग्र महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी तब्बल दीड तास आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मागणीवर ठाम होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरुन याबाबत तातडीने बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच नायब तहसिलदार वसंत पाटील यांनी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार गुुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसिलदार शिवकुमार अवळकंठे, राष्टÑीय प्राधिकरण विभागाचे अभियंता एस. जी. अडसुळे, सोमा टोल वे कंपनी संजय गुरव आदिंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी राष्टÑीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा, दररोज होणाºया अपघातात अनेकांचा जीव जात आहे. याचे सोयरसुतक राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नाही. महिनाभरात ठोस निर्णय घेतले नाही तर यापुढे घडणाºया घटनांना राष्टÑीय प्राधिकरण विभाग जबाबदार राहील. असा सज्जड दम भरत धुळे व नाशिक बाजुकडून येताना मालेगावचे प्रवेशद्वारच दिसत नाही. यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो. १० लाख लोकवस्ती असलेल्या मालेगाव शहराचे प्रवेशद्वार योग्य पद्धतीने करावे, तसेच मुंगसे येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग व सर्व्हिसरोड तयार करुन द्यावा अशा सूचना केल्या. टेहरे येथील महामार्गावर येत्या पंधरा दिवसात पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती, उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे तातडीने सादर करा असे आदेश राज्यमंत्री भुसे यांनी दिले आहेत. बैठकीस राजेंद्र शेवाळे, माजी उपसरपंच प्रभाकर शेवाळे, भरत शेवाळे, संदीप शेवाळे, नाना शेवाळे, विजय शेवाळे, नीलेश पाटील आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.