शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST

राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

मालेगाव : राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळ धुळेकडून येणाºया कंटेनर क्रमांक एच. आर. ५५ ए. बी. ५०६६ याने रस्ता ओलांडणाºया दुचाकी क्र. एम.एच.४१ एम. २७४५ हिला जबर धडक दिली. या भीषण अपघातात संजय अर्जुन पवार (३४) रा. आदिवासी वस्ती व अवि विजय जाधव (१३), ऋषीकेश राजेंद्र जाधव (९) दोघे रा. टेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या टेहरे ग्रामस्थांनी मुंबई-आग्र महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी तब्बल दीड तास आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मागणीवर ठाम होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरुन याबाबत तातडीने बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच नायब तहसिलदार वसंत पाटील यांनी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार गुुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसिलदार शिवकुमार अवळकंठे, राष्टÑीय प्राधिकरण विभागाचे अभियंता एस. जी. अडसुळे, सोमा टोल वे कंपनी संजय गुरव आदिंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी राष्टÑीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा, दररोज होणाºया अपघातात अनेकांचा जीव जात आहे. याचे सोयरसुतक राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नाही. महिनाभरात ठोस निर्णय घेतले नाही तर यापुढे घडणाºया घटनांना राष्टÑीय प्राधिकरण विभाग जबाबदार राहील. असा सज्जड दम भरत धुळे व नाशिक बाजुकडून येताना मालेगावचे प्रवेशद्वारच दिसत नाही. यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो. १० लाख लोकवस्ती असलेल्या मालेगाव शहराचे प्रवेशद्वार योग्य पद्धतीने करावे, तसेच मुंगसे येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग व सर्व्हिसरोड तयार करुन द्यावा अशा सूचना केल्या. टेहरे येथील महामार्गावर येत्या पंधरा दिवसात पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती, उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे तातडीने सादर करा असे आदेश राज्यमंत्री भुसे यांनी दिले आहेत. बैठकीस राजेंद्र शेवाळे, माजी उपसरपंच प्रभाकर शेवाळे, भरत शेवाळे, संदीप शेवाळे, नाना शेवाळे, विजय शेवाळे, नीलेश पाटील आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.