शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST

राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

मालेगाव : राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळ धुळेकडून येणाºया कंटेनर क्रमांक एच. आर. ५५ ए. बी. ५०६६ याने रस्ता ओलांडणाºया दुचाकी क्र. एम.एच.४१ एम. २७४५ हिला जबर धडक दिली. या भीषण अपघातात संजय अर्जुन पवार (३४) रा. आदिवासी वस्ती व अवि विजय जाधव (१३), ऋषीकेश राजेंद्र जाधव (९) दोघे रा. टेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या टेहरे ग्रामस्थांनी मुंबई-आग्र महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी तब्बल दीड तास आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मागणीवर ठाम होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरुन याबाबत तातडीने बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच नायब तहसिलदार वसंत पाटील यांनी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार गुुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसिलदार शिवकुमार अवळकंठे, राष्टÑीय प्राधिकरण विभागाचे अभियंता एस. जी. अडसुळे, सोमा टोल वे कंपनी संजय गुरव आदिंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी राष्टÑीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा, दररोज होणाºया अपघातात अनेकांचा जीव जात आहे. याचे सोयरसुतक राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नाही. महिनाभरात ठोस निर्णय घेतले नाही तर यापुढे घडणाºया घटनांना राष्टÑीय प्राधिकरण विभाग जबाबदार राहील. असा सज्जड दम भरत धुळे व नाशिक बाजुकडून येताना मालेगावचे प्रवेशद्वारच दिसत नाही. यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो. १० लाख लोकवस्ती असलेल्या मालेगाव शहराचे प्रवेशद्वार योग्य पद्धतीने करावे, तसेच मुंगसे येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग व सर्व्हिसरोड तयार करुन द्यावा अशा सूचना केल्या. टेहरे येथील महामार्गावर येत्या पंधरा दिवसात पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती, उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे तातडीने सादर करा असे आदेश राज्यमंत्री भुसे यांनी दिले आहेत. बैठकीस राजेंद्र शेवाळे, माजी उपसरपंच प्रभाकर शेवाळे, भरत शेवाळे, संदीप शेवाळे, नाना शेवाळे, विजय शेवाळे, नीलेश पाटील आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.