शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

तौक्ते चक्रीवादळाने ८१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

नाशिक : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात ...

नाशिक : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार वादळवाऱ्यामुळे आदिवासी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा अधिक फटका बसला आहे.

गुजरातच्या सीमारेषेजवळील तसेच घाटमाथ्यावरील तालुक्यांमधील गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार या तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला होता. रविवार दि. १६ ते बुधवार दि. १८ या तीन दिवसांच्या कालावधीत सुरगाणा, पेठ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला. सुरगाण्यात २५४१ तर पेठमध्ये १४१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सुमारे ८१२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये आंबा, डाळींब, पेरू या पिकांचा समावेश आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाहणारे वारे तसेच पावसाचे सावट जिल्ह्यावर असले तरी सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्रर या तालुक्यांमधील पिकांना फटका बसला. या तालुक्यांमध्ये ७९८ हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले तर काही प्रमाणात डाळींब आणि पेरूची बागही उद्ध्वस्त झाली. ११ हेक्टरवरील भाजीपाला नुकसानीची अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी वादळामुळे पंचनामे करण्यास काही प्रमाणात अडचणही निर्माण झाली होती. सातत्याने होणारा पाऊस तसेच वादळामुळे येणाऱ्या अडचणींनंतरही नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नुकसानीत रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळाने सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले. बुधवारी दुपारनंतर झालेल्या पावसानेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.