शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा ...

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा आणि जोरदार पावसाच्या तडाख्याने सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान आले असून जवळपास ८५० घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला.

वादळाचा वेग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर तालुकापातळीवर आपत्ती निवारणाची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसणार नाही, असा अंदाज वर्तविला जात असला तरी सुरगाणा, कळवण तसेच पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा चांगलाच फटका बसला. अन्य तालुक्यांनाही थोड्याफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कालावधीत कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपिकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.

गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले हाेते. आता तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १९.१४ हेक्टरवरील बागायत पिकांखालील क्षेत्र प्रभावित झाले, तर

१६३३.४७ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचा एकूण अंदाज २ कोटी ९६ लाख ६१ हजार इतका आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने घरांचे अंशत: नुकसान झाले. मका, बाजरी, कांदासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. आंब‍ा, पेरू, डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

--इन्फो--

जिल्ह्यात कोरोनाचे संकट असतानाही चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच कृषी खात्याने पंचनाम्यांचे काम हाती घेतले. तालुका पातळीवरील कृषी अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ ते १९ मे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. नऊ तालुक्यांना वादळाचा फटका बसला असून या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्यात आले आहेत.