शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा ...

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा आणि जोरदार पावसाच्या तडाख्याने सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान आले असून जवळपास ८५० घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला.

वादळाचा वेग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर तालुकापातळीवर आपत्ती निवारणाची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसणार नाही, असा अंदाज वर्तविला जात असला तरी सुरगाणा, कळवण तसेच पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा चांगलाच फटका बसला. अन्य तालुक्यांनाही थोड्याफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कालावधीत कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपिकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.

गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले हाेते. आता तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १९.१४ हेक्टरवरील बागायत पिकांखालील क्षेत्र प्रभावित झाले, तर

१६३३.४७ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचा एकूण अंदाज २ कोटी ९६ लाख ६१ हजार इतका आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने घरांचे अंशत: नुकसान झाले. मका, बाजरी, कांदासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. आंब‍ा, पेरू, डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

--इन्फो--

जिल्ह्यात कोरोनाचे संकट असतानाही चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच कृषी खात्याने पंचनाम्यांचे काम हाती घेतले. तालुका पातळीवरील कृषी अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ ते १९ मे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. नऊ तालुक्यांना वादळाचा फटका बसला असून या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्यात आले आहेत.