शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा ...

नाशिक : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळीवारा आणि जोरदार पावसाच्या तडाख्याने सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान आले असून जवळपास ८५० घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला.

वादळाचा वेग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर तालुकापातळीवर आपत्ती निवारणाची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्याला वादळाचा फारसा फटका बसणार नाही, असा अंदाज वर्तविला जात असला तरी सुरगाणा, कळवण तसेच पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा चांगलाच फटका बसला. अन्य तालुक्यांनाही थोड्याफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कालावधीत कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपिकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.

गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले हाेते. आता तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १९.१४ हेक्टरवरील बागायत पिकांखालील क्षेत्र प्रभावित झाले, तर

१६३३.४७ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचा एकूण अंदाज २ कोटी ९६ लाख ६१ हजार इतका आहे. जिल्हा प्रशासनाने हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने घरांचे अंशत: नुकसान झाले. मका, बाजरी, कांदासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. आंब‍ा, पेरू, डाळिंब या फळबागांनाही फटका बसला आहे. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरील पिके व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

--इन्फो--

जिल्ह्यात कोरोनाचे संकट असतानाही चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच कृषी खात्याने पंचनाम्यांचे काम हाती घेतले. तालुका पातळीवरील कृषी अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ ते १९ मे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. नऊ तालुक्यांना वादळाचा फटका बसला असून या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्यात आले आहेत.