शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

सायकल ट्रॅक मार्ग बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST

दुपारनंतर गल्लीतील दुकाने सुरू नाशिक : शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश ...

दुपारनंतर गल्लीतील दुकाने सुरू

नाशिक : शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. मात्र अंतर्गत रस्त्यावरील दुकाने दुपारनंतर सुरू राहत असून शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुपारनंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी अंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात.

खासगी क्लासेस चोरीछुपे सुरूच

नाशिक : शाळा बंद असल्याने मुले शाळेत जात नसली तरी शहरात अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची घरगुती शिकवणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. कॉलनी, सोसायट्यांमध्ये खासगी घरगुती शिकवणी अनेक ठिकाणी चालते. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थी अशा शिकवणीला पाठविले जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

साेसायट्यांमध्ये निर्बंधाकडे दुर्लक्ष

नाशिक : शहरातील अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आलेले आहेत. असे असतानाही अशा ठिकाणी या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसते. लहान मुले आवारात खेळत असल्याचे तसेच विक्रेत्यांना सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात असल्याने धोका अधिक वाढला आहे.

टाकळी रस्त्यावर पदपथाचे काम

नाशिक : टाकळी रस्त्यावरील दुभाजकांच्या कामाबरोबरच पदपथाचे कामही सुरू झाले आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने पदपथावर पेव्हरब्लॉक टाकले जात असून रस्त्याचे सुशोभीकरण केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर पदपथाचे काम करण्यात आले होते. आता जुने पेव्हरब्लॉक काढून नवीन टाकले जात आहेत.

दुभाजकाला पांढरा रंग असावा

नाशिक : टाकळी रोडवर लोखंडी दुभाजक उभारले जात आहे. येथील दुभाजकांना लवकरच रंगरंगोटीदेखील केली जाणार आहे. वाहनधारकांना रात्री आणि दिवसाही दुभाजक दृष्टीत पडावेत यासाठी दुभाजकांना पांढरा रंग देण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या सुमारासही पांढरा रंग दिसत असल्याने या मार्गावरील अपघाताला आळा बसण्यास मदत होणार आहे.

फळविक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन

नाशिक : हातगाडीवर फळविक्री करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होतांना दिसत आहे. मास्क केवळ हनुवटीवर ठेवून ते ग्राहकांशी संवाद साधत असल्याने अशा विक्रेत्यांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हातागाडीवरील विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

उपनगर रस्त्याचे पालटले रूप

नाशिक : उपनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्याचे रूप पालटले आहे. या मार्गावर भरणाऱ्या बाजारामुळे येथील वर्दळ अधिकच वाढली आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने दुचाकीस्वार सुसाट वेगाने वाहने चालवीत असल्याने शांती पार्क तसेच टाकळी कॉर्नर येथे दुभाजक टाकण्याची मागणी होत आहे.